नवीन लेखन...

लक्ष्मीपूजन..

LaxmiPoojan

आज दिवाळसणाचा चवथा दिवस. दिवाळीची चवथा दिवस म्हणजे सरत्या विक्रमसंवताचा शेवटचा दिवस.. अश्विन वद्य अमावास्येचा हा दिवस ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस..

शेतकऱ्याची दौलत, संपत्ती म्हणजे त्याचं गोधन.. कृषीसंस्कृतीतील सर्वात मोठ्या सणाच्या या चवथ्या दिवशी गांवाकडील शेतकरी गोठ्यातील गो-धनाची, शेळ्या-मेंढ्यांचीपुजा केली जाते…तर शहरात पैसा-सोनं-नाणं म्हणजे लक्ष्मी असं आपण मानत असल्याने त्यांची पूजा करतात..व्यापारीजनांचं नववर्ष उद्यापासून सुरू होणार म्हणून पुढील वर्षीच्या हिशोबाच्यी नव्या चोपड्यांचं पूजन ह्या दिवशी करतात.. व्यापारीलोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतरच्या दिलशी येणाऱ्या पाडव्यापासून सुरू होतं.

या दिवशी वामनाकडून बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करतात अशी पुराण कथा आहे..हा दिवस मुंबईसारख्या लक्ष्मीचा वरदहस्त असलेल्या शहरातील बाजारपेठामध्ये मोठा धामधुमीचा असतो.नयनरम्य रोषणाई, मिठायांचं वाटप, नटून-थटून आलेल्या सर्व वयाच्या आणि आकाराच्या शेठाणी, त्यांच्या आलिशान गाड्या साक्षात लक्ष्मीचा वावर डोळ्यांसमोर उभा करत असतात..डेसीबलची आणि कोर्टाच्या नियमांची पत्रास न ठेवता केलेली फटाक्यांची धडाडधूम डोळ्यांचं पारणं फेडणारी असते..आपण हिन्दू संस्कृतीचा भाग आहेत हा अभिमान या क्षणी निदान मला तरी होतो..

या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. लक्ष्मीपूजन जरी घराघरात साजरं होत असलं तरी हा दिवस खरा लक्ष्मीपुत्र व्यापाऱ्यांचाच.. व्यापारीजन हा दिवस फार उत्साहात साजरा करतात. आणखी एक प्रथा गांवाकडे आणि शहरातही मराठी लोकांत आवर्जून पाळली जाते ती म्हणजे या दिवशी घरी-दारी-गोठ्यात स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी झाडू विकत घेतात..झाडूला साक्षात लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी शिंपडून, तीला सवाष्ण लक्ष्मी मानून तीची हळद-कुंकू वाहून मनोभावे पुजा करतात व नंतरच घरात वापरण्याससुरूवात करतात..स्वच्छतेच्या ठिकाणीच लक्ष्मीचा वास असतो ही श्रद्धा या प्रथेमागे असावी..किंवा घरातलं अमंगल झाडून काढून घरात मंगलाचा वास झाडू निर्माण करते म्हणून तसं केलं जात असावं..

आजच्या लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना शुभेच्छा..आपल्या घरादारात लक्ष्मी व सोबत सरस्वतीचाही वावर राहावा ही शुभेच्छा..! सरस्वती सोबत असली की लक्ष्मी डोक्यावर बसत नाही..

– नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..