नवीन लेखन...

कुत्र्याची पिलं

लहानपणी आम्ही रस्त्यावरची कुत्र्याची पिलं पाळायचो..
त्यांना राहायला खोक्याची घरं करायचो..
सक्काळ-संध्याकाळ चांगल्या, घरच्या पोळ्या दुध खाऊ-पिउ घालायचो..
आठवड्याला आंघोळ घालायचो..
फक्त बांधून मात्र घालायचो नाई..

आम्हाला वाटायचं ‘वा.. काय छान पाळलय आम्ही ह्यांना.. ही काई रस्त्यावरच्या ईतर कुत्र्यांसारखी नाईयेत’ वगैरे मजा असायची..

पण पुढं मोठी झाल्यावर मात्र हीच पिल्लं,आम्ही केलेल्या घरातून निघुन जात..त्यांच्याच इतर भाईबंदांना शोधुन त्यांच्याबरोबर गावभर फिरत उकीरडे चिवडत..

आम्हाला खुप वाईट वाटायचं तेव्हा..

नंतर मोठे झाल्यावर कळलं..

आपण काहीही करत नसतो..

जो तो आपली कुवत आणि गुणधर्म जन्माला येतानाच घेउन येतो..आपण एखाद्याला अगदी कितीही प्रेम, कितीही आदर व चांगली वागणुक दिली तरी त्याचे कान भरणारे कुणी आल्यावर तो आपल्या मुळच्या रंगात परत रंगून आपल्या जन्मजात लायकीच्या लोकांशीच संबंध जोडून घेत त्यांच्याच कळपातच फिरू बघतो..

(ही पोस्ट माझे मित्र श्री. नचिकेत परांजपे यांच्या फेबु वाॅलवरून घेतली आहे. या पोस्टचा सद्य राजकारणाशी किंवा राजकारणात असणाऱ्यांचा काही संबंध नाही.)

— नितीन साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..