नवीन लेखन...

” कुसुमाग्रज ” (तात्यासाहेब शिरवाडकर )

माझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला (‘वाटेवरच्या कविता’) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो.

सुरेंद्र देशपांडे- आमचे नातेवाईक (खरेतर जिंदादिल मित्र) यांचा तात्यासाहेबांशी जिव्हाळ्याचा घरोबा होता. (सुरेंद्र देशपांडे यांचे पिताजी तात्यासाहेबांचे जिवलग स्नेही ! तो स्नेह पुढील पिढीतही उतरला होता.)

सुरेंद्र आम्हाला तात्यासाहेबांकडे घेऊन गेले. अकृत्रिम स्नेहाने अपरिचितांचेही स्वागत करणे ही तात्यासाहेबांची खासियत ! (उगाच आख्खे नाशिक शहर त्यांच्या अधिपत्याखाली नव्हते ! एका कवीची एका गावावर अधिसत्ता हे आजच्या काळात दुर्मिळच नाही का?) परिचय झाल्यावर थोडे बोलणे झाले.

मी भीत -भीत त्यांना – “काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही” या गाण्याची पार्श्वभूमी विचारली . शांतपणे ते म्हणाले -“हे एक प्रेमगीत आहे.” माझी समजूत काही वेगळीच होती म्हणून मला वेगळे उत्तर हवे होते पण…

कवितांची वही ठेवून घेत ते म्हणाले – “वाचून कळवितो.”

निघताना मी त्यांना म्हणालो – “आपल्याला ज्ञानपीठ मिळाल्यावर मी इस्लामपूरहून अभिनंदनपर पत्र पाठविले होते आणि आपण स्वहस्ताक्षरात त्याची त्वरित पोचही पाठविली होती. (आजही त्यांचे ते पत्र माझ्या संग्रही आहे.)

यावर तोच शांत स्वर म्हणाला – “हो ! जवळ जवळ १०,००० हून अधिक पत्रे आली होती ,त्या सर्वांना मी लेखी पोच देऊन शुभेच्छांचा स्वीकार केला.”

ही “अभिजात” असण्याची खूण !

साहित्यिक म्हणून तर ते आपल्या नजरपल्याड होतेच पण एक व्यक्ती म्हणूनही ते तितकेच थोर होते. सहसा हे कॉम्बिनेशन मला आढळत नाही, बहुदा माझ्या निरीक्षणाला /अनुभवाला हा अपवाद असावा.

काही दिवसांनी त्यांचे छोटेसे अभिप्राय -पत्र आले. काव्यसंग्रह आणि आम्ही भरून पावलो!

–डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..