नवीन लेखन...

“किसन” अर्थात….अण्णाऽवतार…

जाहला कहर घोटाळ्यांचा, देखिली, मात्रा अमर्याद भ्रष्टाचाराची ।
स्पर्धा जण जणूं भूवरीं, अब्जावधी रुपये जनांचे, राजरोसपणे हडपण्याची ।
रुपये जनांचे, राजरोसपणे हडपण्याची ।।१।।

त्रस्त झाले अवघेजन, देश पोखरणार्‍या, भ्रष्टाचारी भस्मासुराने ।
उद्रेक महागाईचा, होरपळीजनां, झाले अवघड, जगणे समाधानाने ।।
झाले अवघड, जगणे समाधानाने ।।२।।

भय नाही येथे कुणा, पदोपदीं लाच घेण्याच्या त्या महाभागांना ।
नुरला वाली कुणी, फोडण्यास वाचा, जनमानसाच्या यातनांना ।।
जनमानसाच्या यातनांना ।।३।।

कुणा न कळे, काय करावे, कसा संपवावा बोकाळलेला भ्रष्टाचार ।
सारथ्या विना, जन सारे, खात होते, दाबून तोंड, अन्यायाचा मार ।।
दाबून तोंड, अन्यायाचा मार ।।४।।

यत्न होते सारे, देश-धुरिणांचे, सत्य अवघे सदैव दडपण्याचे ।
कर्माने त्यांच्याच, जाहले धुरिण, जनक खदखदणार्‍या असंतोषाचे ।।
जनक खदखदणार्‍या असंतोषाचे ।।५।।

अपलाप करण्या सत्याचा, जनीं, जे जे करिती, सारा खटाटोप ।
जितुके ठेविती दाबून, उशिरा का होईना, येते उफाळून सत्य अपोआप ।
येते उफाळून सत्य अपोआप ।।६।।

विसरती महाभाग, बैसोनि खुर्चीवरी, आहेत तेथे ते, जनांच्या मर्जीवरी ।
कैफांतअन् नशेत सत्तेच्या गेली मजल त्यांची, जनांना विसरण्यावरी ।।
जनांना पुरते विसरण्यावरी ।।७।।

वानीतुनि तसेच आचरणांतुनि, दाविले अण्णांनी, सामर्थ्य निश्चयाचे ।
वाटले मनोंमनीं धुरिणांस सत्तेच्या, काम नाही हे, असल्या खुळचटाचे ।।
काम नाही हे, असल्या खुळचटाचे ।।८।।

नाही कळला “अण्णा”उन्मच मदांधांना, उचुंग महामेरु तो धैर्याचा ।
हबकली मनें, दोलायमन झाले आसन, आहे, श्रोत तो प्रखर सत्याचा ।।
आहे, श्रोत तो प्रखर सत्याचा ।।९।।

नव्हे ज्ञात, धुरीणींना सत्तेच्या, सामर्थ्य, अलौकिक सत्वशील मनाचे ।
टेकले गुढगे सत्ताधिशांनी, अण्णांस ल ाभतां, सामर्थ्य कोटी कोटी जनांचे ।।
लाभतां, सामर्थ्य कोटी कोटी जनांचे ।।१०।।

राष्ट्र-प्रेमा पोटीं प्रखर, लाविले, अवघेजीवन पणास, देशासाठी ।
ऐकूनि, आर्त शंका या महामानवाची, उतरेल जन, सत्य रक्षिण्यासाठी ।।
उतरेल जन, सत्य रक्षिण्यासाठी ।।११।।

काय सांगावे, सत्तेच्या धुरंधरांना, “ अर्थातुनि आली अंगी धुंदी सत्तेची ।
वाटले तयां, आहेत सम्राट ते, भडकतांच ज्वाला सत्याची, उतरे गुर्मी सत्तेची ।।
भडकतांच ज्वाला सत्याची, उतरे गुर्मी सत्तेची ।।१२।।

काय साधावे, फासवुनिसार्‍या जनांना, जाहले नाहक, धनी अपशब्दांचे ।
राहूनि साधेपणाने, राखूनि पावित्र्य आचरणाचे, केले सार्थक या जीवनाचे ।।
केले सार्थक या जीवनाचे ।।१३।।

धर्म-गलानितुनिया, अवतरला “किसन”, सत्य शोधिण्या भूचरीं ।
जन सागरास, माय-भूमीच्या, दिली हाक, घेऊनि शिर तळ हातावरी ।।
दिली हाक, घेऊनि शिर तळ हातावरी ।।१४।।

घडविला इतिहास अनोखा, या भूवरीं, प्राणांची लावून बाजी ।
कोटी कोटी प्रणाम अमुचे, होऊनि विनम्र, त्यादिव्यचरणां पाशी ।।
होऊनि विनम्र, त्यादिव्यचरणां पाशी ।।१५।।

-गुरुदास / सुरेश नाईक
२८ ऑगसट २०११“राधा-निवास”
मुलुंड (पू), मुंबई ४०००८१

“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..