नवीन लेखन...

किरण आशेचा

सारी पटावर संसाराच्या, भाग्य-रेखा, सुखवी मनाला ।
मार्ग चालतां, नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।धृ।।

चापल्य विजेचे कार्यांमध्ये, उधाण अंगी उत्साहाचे ।
मना पासुनि, व्यस्त राहुनि, कसब आगळे, नाते जपण्याचे ।।
देह झिजवुनि, सकलांसाठी, कौशल्य, अपुलसे करण्याचे ।
परखड बोल बोलुनि, ध्येय, सर्वां, समजुनि घेण्याचे ।।
स्पष्ट वाणींची, स्वच्छ मनाची, अशी ही आहे सरला ।
मार्ग चालतां, नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।१।।

पणास लाविले, कौशल्य अवघे, चालविण्या मुक्तांगण ।
राहुनि वक्तशीर, स्वानंदे खुलविले, स्नेहभरे बालांगण ।।
धुरा वाहुनि पाव शतकीं, भूषविले, ते विद्येचे प्रांगण ।
शैशव आपुले, सदैव जपुनि, फुलविले बालांचे मधुरांगण ।।
काळ असा हा कर्तृत्वाचा, बहरुनि मजेत सरला।
मार्ग साचतां, नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।२।।

टीप-टीप अन् नीट-नेटकेपणा, अंगी भिनलेला ।
तसूं भरही, जीवनीं, नव्हती जागा, ओंगळपणाला ।।
मान राखूनि ताठ, सदा उभी ही अपुल्या कर्तव्याला ।
राहुनि ऐटित, सरसावली, जीणे “देखणे” करण्याला ।।
आवेशाचा आवेग देखुनि, कौतुक वाटते मनाला ।
मार्ग चालतां नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।३।।

आयुष्याच्या, शांत नि सुरेल ऐशा या वळणावरती ।
हलकेच वळविली नजर, अध्यात्माच्या मार्गावरती ।।
ध्यानीं नसतां मनीं, ध्यान लागले, शशि-चरणांवरती ।।
निश्चये होईल गुरुकृपा, ठेवितांच श्रद्धा, नामावरती ।।
स्पर्श लाभू दे मायेचा हीच “आस ” या गुरुदासाला ।
मार्ग चालता, नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।३।।

-गुरुदास / सुरेश नाईक
१ नोव्हेंबर २०११ मलुंड (पू), मुंबई ४०००८१

“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..