नवीन लेखन...

कावळा म्हणाला.. माणसाला..

माणूस म्हणाला..
कावळ्याला’..

एकदा माणूस म्हणाला..
कावळ्याला’..

कसे सांगायचे रे यांना,
बाहेरचे खाऊ नका…

पितृपक्ष चालू झाला,
घरच्या शिवाय जेवू नका..

‘कावळा म्हणाला..
माणसाला’..

‘कावळा म्हणाला..
माणसाला’..

अरे हे बुद्धीमान मनुष्या..

पंधरवडाच फक्त आठवणीने,
नैवद्य खिडकीवर असतो… !

बाकीचे ३५० दिवस मात्र आम्ही,
उकिरड्यावरचं बसतो रे .. !

पुण्य मिळवायच्या आशेवर..
ठेवलास तू घास छतावर..

जिवंतपणीच सांभाळ रे बाळा..
तुझ्या वृध्द पालकांना..

जिवंतपणी त्यांची सेवा करून ..
आणि त्यांचे आशिर्वाद घेऊन ..
पुण्य मिळेल हमखास बाळा..!

जातीपाती विसरून, गोरगरिबांना
दान करून, गरजू ना मदत करून..
गाठी पुण्य कमवशिल हमखास रे .!

‘कावळा म्हणाला..
माणसाला’..

जे का रंजले, गांजले..
त्याशी म्हणा जो, आपुले…
तोचि साधु ओळखावा..
देव तेथे ची जाणावा…!

— गणेश उर्फ अभिजित कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..