नवीन लेखन...

कधी हसावे कधी रडावे

कधी हसावे कधी रडावे
जीवन गाणे गात रहावे
आयुष्याच्या वेलीवर मग
चार माणसे हसत जोडावे
कोण न कुणाचा असा इथे
दुःखाचे थेंब हास्यात बुडावे
रडता रडता पटकन हसावे
हसता हसता मरणं यावे
औट घटकेचा खेळ सारा
जमतील सगे सोयरे सारे
मरणं येईल कधी समोर
शब्दांतून हास्य अलगद खुलावे
असतील आपले नाते कुठले
काव्यांत ओळख उरेल जराशी
हसता हसता उलगडे बंध
मरणं यावे अलगद पाऊली
उरतील खुणा अलगद काही
स्मरतील चांदण शब्द अबोली
हसत हसत दुःखात भिजतील
तुमच्या माझ्या ओळख गाठी
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..