नवीन लेखन...

जीवन असं असावं

जीवन असावं पिकल्या आंब्यागत
मोहकगोड, रसाळ, सतेज रसरशीत

जीवन असावं चंदनाच्या खोडागत
ललाटं रेखून अनेकांची रहावं दरवळत

जीवन असावं देवाजीचा देव्हारा
पावित्र्याच्या ज्योतीने उजळावा गाभारा

आयुष्याच्या ढालीने सग्यासोयऱ्यांना जपावं
उकळत्या दुधावर कसं सायीगत पसरावं

जीवन असावं स्वच्छ अंगण मोकळं
सर्वांसाठी एैसपैस मध्ये तुळशीचं खळं

जीवन असावा एक आधारवृक्ष
विशाल, समृद्ध, शीतल सावलीछत्र

जीवन असावं टवटवीत नित जिवंत
मोह व्हावा मृत्यूसही स्पर्शण्या हरक्षणात

जीवन आहे देवाचं देणं, वांछिल तो तेव्हा ते समर्पण
तोवर सजवावं, तोऱ्यात मिरवावं, समाधानी लेवून तृप्तीचं लेणं

जीवन व्हावं असंख्य कणांचं, सुगंधी नि रंगीबेरंगी क्षणांचं
उत्कटतेने, उदंडतेने, उधळत वहावं, जुळून नातं मनामनाचं

— यतीन सामंत
ऋणानुबंध या कवितासंग्रहातून

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..