नवीन लेखन...

जग आणि जग..

हसून सोडून देण्यापलीकडे ह्या जगाची फारशी मोठी लायकी नाही..जगाला गांभिर्याने घेतलं की मग हे जग आपलं सरळ जगणंही उगाचंच गंभिर आणि क्लिष्ट करून टाकते..

शेवटी जग म्हणजे कोण, तर आपल्याला जी चार लोकं ओळखतात तेच आपल्यासाठी जग असतं..ही चार-दहा लोकं सोडली तर आपण कसे आहोत व काय करतोयत या विषयी इतर कुणाला काहीच कर्तव्य नसतं..पण आपण काहीतरी वेगळं केलं की मात्र या चार लोकांच्या पलिकडल्या जगाचं आपल्याकडे लक्ष वेधलं जातं..मग असं असताना आपलं हे चार लोकांचं ‘जग’ काय म्हणेल म्हणून आपण आपल्याला मनापासून कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी करण्यापासून स्वत:ला परावृत्त करतो आणि आपल्या सभोवतालच्या चार लोकांच्या जगापुढे मन मारून ‘जग’त राहातो..

‘जग’ आणि ‘जग’ सारख्याच अक्षरांचे दोन शब्द, केवळ ‘ज’च्या वेगवेगळ्या उच्चारांमुळे अर्थात केवढा मोठा बदल होतो..!!

म्हणून म्हणतो, हसून सोडून देण्यापलीकडे ह्या जगाची फारशी मोठी लायकी नाही..या चार लोकांच्या ‘जगा’पलीकडे पाहायला शिकलो की मगच ‘जग’णं काय आणि कशालाठी हे कळतं, कळेल..!!

-नितीन साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..