नवीन लेखन...

सागरमालामुळे वाढती महासागरी वाहतुक आणि सागरी सुरक्षा

“राज्यातील बंदरे आणि रस्ते विकास कामांसाठी ७ लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ५ लाख कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे.” अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ने भाऊचा धक्का परिसरात बांधलेल्या आंतरदेशीय क्रूझ टर्मिनलचा उद्घाटन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. मुंबई ते गोवा जलमार्गावर सागरी पर्यटनाचा आनंद देणाऱ्या देशातील पहिल्या आंतरदेशीय ‘आंग्रीया’ क्रूझला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या वतीने भाऊचा धक्का परिसरात आंतरदेशीय क्रूझ टर्मिनल उभारण्यात आले आहे.

वाराणसी मधील मल्टिमॉडेल टर्मिनल

२०६ कोटी रुपये खर्चून वाराणसीत मल्टिमॉडेल टर्मिनल बांधण्यात आला आहे. २०० मीटर लांब आणि ४५ मीटर रुंद असलेल्या जेट्टीवर माल चढवणे आणि उतरविण्यासाठी जगातील अत्याधुनिक क्रेन बसविण्यात आली आहे. मल्टिमॉडेल टर्मिनलमुळे गंगा नदीचा पारंपरिक रस्ता आधुनिक सुविधांसह नेचर, कल्चर आणि अॅडव्हेंचरचे केंद्र होणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपण नद्यांचे मार्ग इतक्या व्यापक स्तरावर विस्तारण्यात यशस्वी झालो आहोत. वाराणसीत जितके सामान एका मालवाहतूक जहाजाने आणण्यात आले, तेवढेच सामान रस्तामार्गे आणण्यासाठी १६ ट्रक लागले असते.  या जलवाहतुकीमुळे पूर्व उत्तर प्रदेश व पूर्व उत्तर भारत थेट बंगालच्या खाडीशी जोडला जाणार असून, वेळ आणि पैसे दोहोंची बचत होणार आहे.

कल्याण-ठाणे-वसई आणि कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुक

ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या, पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे. ठाणे-कल्याण-वसई या जलमार्गासाठी ६४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.केंद्र सरकारने कल्याण-ठाणे-मुंबई या जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला आहे.त्याअंतर्गत डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि मीरा रोड येथे चार जेट्टींच्या बांधकामाला सुरुवात होत आहे.यामुळे कल्याण आणि ठाणे शहरातील वाहतुककोंडीही कमी होण्याची शक्यता आहे.

सागरमालामुळे सागरी वाहतुक क्षेत्रात क्रांती

घोघा-भरूच आणि दहेजदरम्यान ‘रोल ऑन, रोल ऑफ (रो-रो)’ या नौका सेवेच्या पहिल्या टप्प्यात रस्ते मार्गाने दोन्ही शहरातील अंतर ३१० किमी असून, नौका सेवेमुळे ते केवळ ३० किमी इतके होणार आहे. जे सामान रस्तामार्गाने नेण्यासाठी प्रत्येक कीलो मीटर दीड रुपयांचा खर्च येत होता, तेच साहित्य जलमार्गाने नेण्यासाठी केवळ २० ते २५ पैशांचा खर्च येणार आहे. यामुळे पेट्रोलियम इंधनाची मोठी बचत होणार आहे. भविष्यात ही सेवा मुंबईपर्यंत नेण्यात येईल.या फेरीमुळे कोट्यवधी लोकांचे आयुष्य सुरळीत होईल. एका फेरीत ५०० हून अधिक व्यक्ती आणि सुमारे १०० वाहनांची वाहतूक करता येते.

जलसेवेचा उपयोग केल्यास मालवाहतूक किफायतशीर

सागरमाला प्रकल्पाअंतर्गत भाऊचा धक्का ते रायगडमधील दिघी व दिघी ते रत्नागिरीतील दाभोळ अशा जलप्रवासी वाहतुकीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता ही सेवा नियमित होण्याच्या व ती पुढे सिंधुदुर्गपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. पर्यटनाप्रमाणेच व्यापारी वाहतुकीसाठी या जलसेवेचा वापर अत्यंत गरजेचे आहे. मासे व आंबा-काजू हे कोकणी जनतेचे प्रमुख आर्थिक स्रोत. जलसेवेच्या माध्यमातून या उत्पादनांची जलद व सुरक्षित वाहतूक होणार असल्याने ताजेपणाच्या निकषावर अधिक दर मिळू शकतो. आंब्याच्या करंडय़ा बोटीतून मुंबईत भाऊच्या धक्क्यावर उतरवून त्या क्रॉफर्ड मार्केटला जातिल. मुंबईतून कार घेऊन जाणाऱया व्यक्तीला गोव्यात ती उतरवता येईल, गोवा भ्रमंती करून पुन्हा कारसह मुंबईत येता येईल, अशी योजना आहे.

जलपर्यटन हा नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. गोवा, केरळसारख्या राज्यांनी जलवाहतुकीच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. कोकणच्या या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जलवाहतूक उत्तम पर्याय ठरू शकतो.

जलवाहतुकीद्वारे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढ

इकॉनॉमिक इंजिन’ म्हणून सागरी किनारपट्टीचा वापर होतोय. भारताला लाभलेल्या किनारपट्टीवरील बंदरांचे आधुनिकीकरण (मॉडर्नायझेशन ऑफ पोर्टस) करून तेथे ‘इंडस्ट्रीअल क्‍लस्टर्स’ सागरमाला प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहेत. ग्लोबल शिपिंगच्या दृष्टीने बंदरांच्या विकासाद्वारे एक कोटी रोजगार उपलब्ध होणार आहेत. जलवाहतुकीद्वारे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढ होईल.रेल्वेने वाहतुकीचा खर्च सव्वा रुपया, रस्त्याद्वारे एक रुपया, तर जलवाहतुकीद्वारे पंचवीस पैसे एवढा फरक आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही जलवाहतूक उपयुक्त आहे.

देशाचा विचार करता सध्या मोठे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हे समुद्री भागापासून दूर आहेत. यामुळे येथे तयार झालेला माल निर्यात करण्यास किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यास येणारा खर्च जास्त आहे. जगात जलवाहतूक ही सगळ्यात स्वस्त आणि इकोफ्रेंडली मानली जाते. भारतमाला प्रकल्पाद्वारे विविध सुसज्ज रस्ते तयार करुन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर किनारपट्टीच्या राज्यांना जोडला जाणार आहे.

आपल्या देशाला ७,५०० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. तसंच देशात सुमारे २० हजार किलोमीटरचा नदीचा मार्ग उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन विविध भागात जलवाहतुकीला चालना दिल्यास, देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळू शकते. त्या दृष्टीने जलवाहतुकीतून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने देशातल्या १२ महत्त्वाच्या बंदरांच्या विकासावर भर दिला आहे.

सतत वाढत्या महासागरी वाहतुकीचे नियमन व सुरक्षा

इंटेलिजन्स ब्युरोकडून मागच्या महिन्यात माहिती आली, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्करे तोयबा, जैश ए मोहम्मद समुद्रातुन महाराष्ट्र, गुजरात राज्यांच्या किनार्यावर असलेल्या महत्वाच्या स्थळांवर/आस्थापनांवर हल्ले करून नुकसान पोहोचवू शकतात. माहितीनुसार जैश ए मोहम्मदचे 600 दहशतवादी लष्करे तोयबा बरोबर पाकिस्तनच्या समुद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

भारतीय किनारपट्टीवर, विस्तृत पल्ल्यातील महासागरी हालचाली वाढत आहे. जशा की, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व पर्यटन, समुद्री तेल-संशोधन (ऑईल एक्सप्लोरेशन), मासेमारी, जलालेख सर्वेक्षण, गस्त इत्यादी. ह्या सर्व हालचालींच्या परिणामी, मालवाहू नौका (कार्गो शिप्स), प्रवासी नौका (पॅसेंजर लाँचेस), कंटेनर्स, तेल-हौदवाहने, धाऊ,बार्जेस, मासेमारी नौका, गस्ती नौका, युद्धनौका, तळ-उत्खनक (ड्रेजर्स) आणि खेचकनौका (टग) इत्यादी स्वरूपाची दीर्घ पल्ल्यातील समुद्री वाहने आवागमन करू लागली. अनुमान आहे की, एका दिवसात, भारतीय किनारपट्टी २,११५ जहाजे, ६९० किनारी नौका, ८५० धाऊ, ४०० बार्जेस, ३०-४० तळ-उत्खनक आणि ३.६ लाख मासेमारी नौका, हाल चाल करतात.

येत्या वर्षांत प्रवासी आणि किनारी व्यापार अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.या वाढत्या हालचालीमुळे अपघात,घातपात होण्याची शक्यता वाढली आहे. मागच्याच महिन्यात एका परदेशी बोटीने एका कोळी बोटीला धडक  दिल्यामुळे अनेक कोळी बांधव म्रुत्युमुखी पडले.यामुळे सतत वाढत्या महासागरी वाहतुकीचे नियमन करणे जरुरी आहे.ह्या जहाजांची देखरेख आणि त्यांच्या हालचालींचे नियमन, सुरक्षा बलांकरता आणि कायदा व सुव्यवस्था राखणार्‍याकरता आव्हानच ठरलेले आहे. हे घटक भारतीय किनारपट्टीच्या, समुद्री गुन्हेगारी हालचालींबाबतच्या तसेच दहशतवादी धोक्यांत भर घालतात.

अजुन काय करावे

सुरक्षितता गरजेमुळे, आपण आपल्या पश्चिम किनार्‍यावरील प्रादेशिक पाण्यातील तसेच इतर भागातील वाहतुकीच्या नियमनाकरता करू शकतो.

वाहतूक वाढते तसे, प्रादेशिक पाण्याच्या हद्दीच्या किंचित आतल्या भागात, प्रत्येक बंदराकरता आपण एक भौगोलिक नोंदबिंदू (Geographical Reporting Points )प्रस्थापित केला पाहिजे. तसेच जहाजांकरता बंदराच्या आत प्रवेशकरण्या पुर्वीची प्रतीक्षाक्षेत्रे निश्चित केली पाहिजेत आणि प्रमुख बंदरांच्या प्रवेशाकरता मार्गही आखले पाहिजेत. महासागरी आणि किनारी वैध व्यापारी वाहतुकीने हे मार्ग पाळावेत. त्यामुळे वाहतूक प्रवाह सुरळित होईल आणि अंमलबजावणी दलांचे काम सोपे होईल.

जिथे जिथे सघन वाहतूक असेल तिथे, गर्दी कमी करण्यासाठी , विशेषतः मोठ्या बंदरांनजीक, पर्‍यायी मार्ग काढले पाहिजेत. ह्यामुळे संशयास्पद जहाजांवर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल.विशेषतः केरळच्या किनार्‍यावर पर्‍यायी मार्ग घडवणे आणि जलवाहतुकीचे नियमन करणे महत्वाचे आहे.

महासागरी सामर्थ्ये असलेले आशियातील दहशतवादी गट, लष्कर-ए-तोयबाची जलशाखा, चाचेगिरी यांच्या क्षमतेचा आपण नियमीतपणे अंदाज घ्यावा. त्यांच्या कार्यपद्धतीनुसार, प्रतिबंधात्मक उपाय तयार करावे.

महासागरातील अंमली पदार्थांची तस्करी नियमितपणे होतच असते. आंतरराष्ट्रीय गुप्तवार्ता सहकार्य आणि संवेदक उपकरणे/साधनेच्या  साहाय्याने तिच्यावर मात करता येऊ शकेल.

सुरक्षा दलांकडूनचे, डावपेचात्मक (टॅक्टिकल) आणि आपत्तीकालीन व्यवस्थापन प्रतिसाद, तयार / निर्माण केले जाऊ शकतील. आपल्या बंदरांतील आणि किनार्‍यावरील; कठीण प्रसंग (काँटिन्जन्सीज)/ अपघात/ घातपात इत्यादींची रंगीत तालीम करून; व्यवस्थापन प्रतिसाद, तयार / निर्माण केले जाऊ शकतील.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..