नवीन लेखन...

मलेरियाचा इतिहास – भाग २

इ. स. पूर्व चौथ्या शतकापर्यंत रोमन साम्राज्यातही मलेरियाने घट्ट पाय रोवले होते. साथीच्या या तापाचा त्याकाळी रोमन फीवर या नावाने उल्लेख होत असे. राणी क्किओपात्राच्या महालात मच्छरदाण्यांचा वापर नेहमी केला जात असे असा उल्लेख आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते रोमन साम्राज्याचा ऱ्हासाला मलेरिया रोग देखील कारणीभूत होता.

इटली हा दलदलीचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असल्याने तेथे मलेरियाचे माहेरघर होते. इटलीमध्ये मलेरियावरील संशोधन जगात प्रथम सुरू झाले. त्यावेळी घडलेल्या  वितंडवादाचा परामर्श पुढील प्रकरणात घेतला आहे.

चीनमध्ये ५००० वर्षांपूर्वी मलेरिया संबंधात इतके ज्ञान होते की त्या देशातील धाडसी प्रवासी जगातील विविध देशांच्या सफरीवर निघत त्यावेळी आपल्या बायकांचा निरोप घेताना ते त्यांना पुनर्विवाहाची मानसिक तयारी करण्यास सांगून ठेवीत, कारण प्रवासात बरेच वेळा हा रोग मृत्यूला कारणीभूत ठरत असे.

सुमेरिया व इजिप्त मध्ये ३५०० वर्षांपूर्वी ताप व सोबत वाढलेली प्लीहा (Enlarged Spleen)अशा प्रकारचे अनेक रोगी असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आलेले आहेत. इजिप्शियन ममींच्या उत्खदनात त्यांच्या शरीरात वाढलेल्या प्लीहा आढळलेल्या आहेत. युरोपियन व आफ्रिकन लोकांची रोगप्रतिबंधकारक शक्ती बहुतांशी एक सारखी होती परंतु Falciparum मलेरिया विरुद्ध युरोपियनांत मुळीच प्रतिक्षमता नव्हती. १७९० मध्ये हायटी बेटावरील गुलामांचे बंड मोडून काढण्यासाठी फ्रान्सने सैन्य पाठविले, त्यात मलेरियामुळे या सैन्याची वाताहात झाली होती. वेस्टइंडीज वरील ऍडमिरल व्हर्नानच्यानेतृत्वाखालील ब्रिटिश आरमारी मोहिमेचा मलेरियाने फज्जा उडवला. एकोणतीस हजार नौसैनिकातील अर्ध्याहून अधिक सैन्याला मलेरियाच्या डासांनी यमसदनास पाठविले.

– डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..