नवीन लेखन...

हरिप्रिया

संवाद लेखन

हरिप्रिया

१)
प्रियकर:-तुला आठवते का?आपली पहिली भेट.
१)
प्रेयसी:-हो तर,का नाही आठवणार?
२)
प्रियकर:-मी तुला नेहमीच झाडाआडून बघायचो.
२)
प्रेयसी:- मला ते ठाऊक होतं रे
३)
प्रियकर:-अन् तो दिवस उगवला .
३)
प्रेयसी:-१५ऑगस्टचा
४)
प्रियकर:-हो.तुझी तारखही लक्षात आहे ना!!!!
४)
प्रेयसी:-मी कधीच विसणार नाही तो दिवस.
५)
प्रियकर:- मी घाबरतच गुलाब दिला होता तुला.
५)
प्रेयसी:-अरे,अजूनही जपून ठेवलाय मी माझ्या डायरीत.
६)
प्रियकर:-मी तर पाकळ्या सुद्धा मोजल्या होत्या त्याच्या.
६)
प्रेयसी:-तब्बल १६ होत्या,गंमत म्हणजे माझं वयही १६च होतं
७)
प्रियकर:-म्हणूनच मी ते फुल निवडलं होतं.
७)
प्रेयसी:- किती बारीक सारिक गोष्टींचा विचार करायचो नं आपण.
८)
प्रियकर:-तुला आठवतं,आपण एकाच ताटात जेवलो होतो.
८)
प्रेयसी:-आणि तो एकमेकांना भरवलेला घास.
९)
प्रियकर:-मी एफ.वाय ला होतो.
९)
प्रेयसी:- हो ना,आणि मी अकरावीला.
१०)
प्रियकर:-लास्ट इयरला मी कॉलेज सोडलं .
१०)
प्रेयसी:-आणि आपल्या भेटी-गाठी कमी झाल्या.
११)
प्रियकर:-नोकरी निमित्त मी परगावी गेलो.
११)
प्रेयसी:-आणि ,आणि फक्त विरह विरह आणि विरह…
१२)
प्रियकर:-अशातच तुझ्या बाबांनी तुझं लग्न लावून दिलं.
१२)
प्रेयसी:-हो!!!!!
त्या दिवशी माझं कशातच लक्ष नव्हतं.
१३)
प्रियकर:-तु तर एका पुतळ्यावत सगळ्या विधिंना पार पाडलस.
१३)
प्रेयसी:-पण तुला हे कसं काय कळलं
१४)
प्रियकर:-आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो,हे सागण्यासाठी मी आलो होतो.
१४)
प्रेयसी:-पण,तुला उशीर झाला यायला असंच ना.
१५)
प्रियकर:-हो .हे खरच आहे.मी उशीरा पोचलो.
१५)
प्रेयसि:-आणि मी कायमची दुसऱ्याची झाले.
१६)
प्रियकर:-तुला आठवतं ,मी तुला एक पत्र पाठवलं होतं.
१६)
प्रेयसी:-जपून ठेवलं आहे मी ते पत्र.
१७)
प्रियकर:-मी तुला वचन दिलं होतं,ते आजतागायत पाळतोय.
१७)
प्रेयसी:-असं नको होतं तू करायला.
१८)
प्रियकर:-मी केलं ते बरोबरच.
१८)
प्रेयसी:-कसं काय?
१९)
प्रियकर:-कारण तुझं माझ्यावरचं प्रेम अजूनही तितकच अतूट आहे ,याची खात्री आहे मला.
१९)
प्रेयसी:-पण शरीराने मी तुझी कधीच नाही होऊ शकणार रे मी.
२०)
प्रियकर:- नाही तर नाही.
२०)
प्रेयसी:-असं का करतोस? तुही लग्न कर. तुझा संसार बघून मला बरं वाटेल.
२१)
प्रियकर:-नाही अगं!आता ते शक्य नाही.
२१)
प्रेयसी:-पण का?
२२)
प्रियकर:-कारण तुझ्या पतीला मी वचन दिलय.
२२)
प्रेयसी:-काय सांगतोस?आणि ते वचन तरी कोणतं
२३)
प्रियकर:-ते आजारी पडल्यानंतर त्यांनी मला एक दिवस भेटायला बोलवलं.आपलं प्रेम त्यांना ठाऊक होतं.अशातच ते आजारी झाले.आपल्या जगण्याची शाश्वती नाही ,हे बघून तु व तुझी मुलं ,ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.
२३)
प्रेयसी:-आणि हे सगळं तू मला आज सांगतोय.
२४)
प्रियकर:-हो,कारण मी वचनबद्ध होतो
२४)
प्रेयसी:- किती मोठा हा त्याग. किती मोठं समर्पण.
२५)
प्रियकर:-तुझ्या सुखातच माझं सुख मी बघितलं प्रिये.
२५)
प्रेयसी:- निघते मी,घरी जायलाच हवं.मुलं वाट बघत असतील.
पण हे दिलवरा मी तुला वचन देते ,की ही प्रिया पुढील जन्मी निश्चितच
*हरिप्रिया* झाल्याविना रहायची नाही.ह्या प्रियेला हरी पासून साक्षात परमेश्वरही दूर करू शकणार नाही.

सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..