नवीन लेखन...

‘गोलमाल ‘चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली

सत्तरच्या दशकातील शहरी महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय चित्रपट रसिकांना अमोल पालेकरच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील घौडदौडीचे विशेष कौतुक होते. त्यातही त्याने काही quality pictures मध्ये त्याने भूमिका साकारल्याने तर तो लाडका नायक झाला. असाच एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गोलमाल ‘ ( रिलीज २० एप्रिल १९७९) च्या प्रदर्शनास तब्बल ४३ वर्षे पूर्ण होत आहेत.

मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.

एन. सी. सिप्पी निर्मित या चित्रपटाची कथा शैलेश डे यांची तर पटकथा सचिन भौमिक यांचे तर संवाद डाॅ. राही मासूम रझा यांचे आहेत. छायाचित्रण जयवंत पाठारे यांचे आहे. या चित्रपटात बिंदीया गोस्वामी, डेव्हिड, देवेन वर्मा, दीना पाठक, अंजन श्रीवास्तव, शुभा खोटे, युनुस परवेझ, केश्तो मुखर्जी, मंजू सिंग, ओम प्रकाश इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच अमिताभ बच्चन, रेखा, हेमा मालिनी, झीनत अमान इत्यादींच्या पाहुणे कलाकार म्हणून भूमिका आहेत. या चित्रपटाला राहुल देव बर्मनचे संगीत आहे. आनेवाला पल जानेवाला है ( पार्श्वगायक किशोरकुमार), एक दिन सपने में देखा सपना ( किशोरकुमार आणि अमितकुमार), गोलमाल है सब गोलमाल है ( सपन चक्रवर्ती व आर. डी. बर्मन), एक बात कहू गर मानो तुम ( लता मंगेशकर) या चित्रपटातील ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. स्वच्छ चित्रपटाच्या चाहत्यांना हा चित्रपट मस्त मनोरंजन आहे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..