नवीन लेखन...

गोड चोरी

रविवारला विदर्भ एक्सप्रेसने नागपुरवरुन कल्याणसाठी यायला निघालो.
नेहमीच खिडकीतुन कितीदा बाहेर बघत राहायचं.
तसा पाउसही नव्हता…बाहेरचं दृश्य.बघण्यासाठी….!

लॅपटाॅपवर’ विक्रम-वेधा ‘तामील चित्रपट बघणे सुरु केले..सुकु,म्हणजे माझ्या मुलीसोबत.

भाषेचा अडसर नव्हताच. सबटायटलमुळे कळत होतं.

पोलीस इंन्सपेक्टर , विक्रम( माधवन) एकाही निरपराध व्यक्तीला मारणार नाही असं म्हणणारा एन्काउंटर फेम अधिकारी…… छानच रंगवला..

तर गुंड वेधा….आपण का वाईट कामं करतो ..याची एकएक स्टोरी विक्रमला सांगत जातो.

पोलीस अन गुंड दोघांच्या खुन करण्यामागचं साम्य,पुसटंशी रेषा वारंवार दोघांच्या संवादात येत राहते..

शेवट मी सांगत नाही.,तुम्ही बघाच.

अकोला येण्याआधी चित्रपट बघुन झाला तोपावेतो चार्जींगही संपले होते.
जेवणंही झाले.
आता झोपावं म्हणून बर्थशिट लावणे सुरु केले.
वरच्या शिटवरिल काही जण आधीच झोपले होते.,त्यांनी आधीच लाईट बंद करायला लावला होता.
सुकुने शिटखाली ठेवलेली बँग बाहेर ओढली.
झीप ओढली.. मिठाईचे पाकेट दिसलेत..वाव, मावशीने नागपुरी संत्रीची मिठाई दिलेली दिसते

न सांगता ठेवलं असावं पाँकैट! सरप्राइज द्यायला!
मावशीचं कौतुक करत ..
एक मिठाईचा पुडा फोडला. एक तुकडा मला दिला.एक स्वतः खात.

बँगेतील चादर,बेडशीट काढू लागली

हे काय!
या चादरी आपल्या नाहीच.
अरेच्चा! ही बँगच आपली नाहीच तर!

तिच्या लक्षात अालं. चुकून दुसर्‍याची बँग उघडली गेली होती.
माझ्याही लक्षात आलं..
काय हा पागलपणा सुकू ?

एकसारख्या रंगामुळे,बँगेमुळे हे झालं..शिवाय अंधारामुळेही..
बँगवाला वर झोपलेला असावा.
बाजुला बसणार्‍याच्या लक्षात आले नाही.आमचा वेंधळेपणा.
लगेच आमच्या बँगमधुन बेडसशिट काढून काहीही न झाल्यासारखं सुकु नी मी आपापल्या बर्थवर लेटलो..

खुप हसु येत होतं…पण आजुबाजुला लक्षात येवू नये म्हणून तोंड झाकुन हसत होतो.
चुक तर झालीच होती. पण मुद्दाम लक्षात आणून द्यावी का?

बघू उठला झोपेतुन तर सांगू या! म्हणत
शिवाय आम्हाला कुठे माहीत होतं..बँग नक्की कोणाची होती ते!

चुकलं तर आमचं..!
कल्याण येईपावेतो वरचे दोघंही शीटवर मस्त झोपलेले..
आम्ही कल्याणला उतरलो.
पण काय करायला हवं होतं..?
सांगा तुम्हीच!

वेंधळेपणा वर हसाच तुम्हीही?

Avatar
About श्रीकांत पेटकर 43 Articles
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..