नवीन लेखन...

गीत गा

अंधार पडला आहे
उजेडाचे गाणे गा
वेदना असह्य आहे
सुखाचे गीत गा

रडणे आता भाग आहे
हसण्याचे गाणे गा
समोर नागफणा आहे
स्तब्धतेचे गीत गा

अपघात अटळ आहे
सावरण्या गाणे गा
मरणा जवळ आहे
जीवनाचे गीत गा

युद्धाचा ढग आहे
शांतीचे गाणे गा
निस्तेज मन आहे
प्रसन्नतेचे गीत गा

गाण्यांना संगीत आहे
मानवता रीत जगा
निसर्ग ढळतो आहे
समर्पणाचे गीत गा

— विठ्ठल जाधव.

संपर्क: ९४२१४४२९९५

शिरूरकासार, बीड.

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..