नवीन लेखन...

गरीबी हटाव

(सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर म्हणाले मी मुख्यमंत्री झालो आता मी गरिबांची पूजा बांधणार -)

स्वातंत्र्य मिळाले
तेव्हा ते म्हणाले
गरिबी हटाव!
त्यानंतर
कित्येक पंतप्रधानांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
मुख्यमंत्र्यांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
मंत्र्यांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर कित्येक
आमदाराने खासदारांनी
आपली गरिबी हटवली
त्यानंतर त्यांच्या कित्येक
बगल बच्यांनी
आपली गरिबी हटवली
स्वातंत्र्य मिळून
पन्नास वर्षे झाली
गरिबी कुठे हटली?
यांची बिचारी गरिबी
पिढ्यान् पिढ्या
कधी हटणारच नाही
गरिबीचे यांनी
केले कुत्रे
लाचार लूत भरलेले
यांच्या गरीबीचे
कुत्रे मात्र
लठ्ठ लाचेचा पाव खाते!
गरीबीचा मंत्र
जपायचा
डोळे झाकून
दुनिया झुकते
झुकणारी जनता
गरीबच असते
दिसते तसे नसते
म्हणून जग फसते
गरिबी हटली
तर श्रीमंती
राज करील कसे?

— विनायक अत्रे.

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..