नवीन लेखन...

फिल्मी कानोसा – फॅंड्री

समांतर चित्रपटांचा प्रवाह मराठीत पुन्हा नव्याने दाखल होताना दिसतोय.एका अर्थी आपल्या सिनेमासाच्या दृष्टीनेही हा खुपच महत्त्वपूर्ण पडाव आहे कारण चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी असे सिनेमे बनणं गरजेचं आहे;असो.शुक्रवारी रिलीज झालेल्या फॅंड्रीचा विषय खुपच विचार करायला लावणारा आहे. या चित्रपटातून समाजातील एका विशिष्ट वर्गाची व्यथा, त्यांचं रहाणीमान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा अगदी हळूवार पण नेमक्या शब्दात मांडण्यात आल्या आहेत.

ही कथा घडते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या एका गावातल्या एका कुटुंबाची,ज्यामध्ये त्यांचं जगणं, त्यांच्या सामाजिक व्यथा, त्यांची साधी आणि छोटी पण त्यांच्या दृष्टीने मोठी स्वप्ने, समाजात मानाने जगता यावे यासाठीची धडपड असेल हे सर्व ” फॅंड्री ” चित्रपटातून मांडलेलं दिसतं. ह्या कुटुंबातील प्रमुख व त्यांची ,पत्नी लहान-मोठी कामे करून आयुष्याचा चरितार्थ चालवण्याचे काम करते.त्यंची मुले सुध्दा त्यांना आपल्या परिने मदत करताहेत; पण मुलाचे लक्ष कामात न रहाता शिक्षणात आहे. शिकून मोठं नाव कमवावे असं स्वप्न देखील तो बाळगून आहे. त्या कोवळ्या मुलाचं भावविश्व , शालेय जीवनातील प्रसंग , पौगंडावस्थेतील नेमकी मनस्थिती बोलक्यारुपातच पेश केले गेल्यामुळे ही कथा वास्तवादी वाटत रहाते. पण नेमके असे काय घडते की ज्यामुळे या मुलाला व त्याच्या समाजाकडून नेहमीच अस्पृश्य म्हणून पाहिले जाते ? हे पाहिल्यावर अंतर्मुख होऊन प्रत्येक प्रेक्षक विचार करेल अश्या पध्दतीने या चित्रपटाच्या विषयाची बांधणी केलेली आहे. त्यामुळे आपल्या अवती-भवती काय नेमकं घडतेय याचं भान आल्यावाचून रहात नाही.
चित्रपटाच्या कथेत दिग्दर्शकीय कौशल्याचा खुपच प्रभावीरित्या वापर झाल्याचं दिसून येतं. पटकथा ,संवाद तसंच लोकेशन्स, संकलन, यासारख्या तांत्रिक पातळीवर तर चित्रपट यशस्वी झालाच आहे, पण .छायाचित्रण सुध्दा बोलका ठरलयं. त्यामुळे दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे हे आपल्या समोर येत रहातं. सोमनाथ अवघडे, सूरज पवार, राजेश्वरी खरात, छाया कदम, प्रविण तरडे, किशोर कदम आणि इतर कलाकारांनी साकारलेल्या भूमिकेतून दमदार अभिनयाचं दर्शन घडतं. पण विशेष कौतुक करावे लागेल सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार या दोन बालकलाकारांची. हे दोन्ही पडद्यावर अगदी सहजरित्या वावरल्यामुळे त्यांच्या बोलक्या नजरेतून रसिकांची मने जिंकून घेतली आहेत.
आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे चित्रपटाच्या संगीताचा; अजय-अतुल यांचं संगीत प्रसंगानुरूप येत गेल्यामुळे कथेतला आशय सुध्दा टिकून रहातो, आणि एकप्रकारे सिनेमाला नवा फील प्राप्त होतो.
असा हा फॅंड्री तुमच्या आमच्या आसपास वावरणारा; तो कदाचित वेगळ्या रुपात वेगळ्या विषयाच्या निमित्ताने आपल्या समोर पडद्यावर सकारला गेला असेल पण त्याची व्यथा आणि कथा या चित्रपटातील जांभुवंत (जांभ्या) सारखीच आहे. एकूणच हा चित्रपट म्हणजे सामाजिक, प्रेम, मानवता, भारतातल्या तळातील एका समाजाचं प्रतिनिधीत्व कराणारा तर आहेच पण एक भीषण सामाजिक वास्तव “फॅंड्री” च्या रुपाने जगासमोर आले आहे. म्हणून हा केवळ चित्रपट नसून एक ज्वलंत वास्तव आहे,चालतं बोलतं उदहारणं आहे; तेव्हा थिएटर मध्ये जाऊन अवश्य अनुभव घ्या “फॅंड्री” हा सत्यपूर्ण सिनेमा पाहून !

 

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..