नवीन लेखन...

दुष्काळ

आला म्हणती तो काळ
असा पडतो दुष्काळ ||धृ ||

नसते पिण्यास पाणी
नसते खाण्यास धान्य
नसते रानात पळपळ
नसते वनात सळसळ ||१||

मरती भूकेली गुरंढोरं
पडती आजारी पोरंसोरं
होई जीवांची तळमळ
रडते कडेवर ते बाळ ||२||

मोकळी झालेली गव्हाण
दु:ख धरतीचं आंदण
होई ओसाड तो माळ
राती भेटेना सकाळ ||३||

कुठे घडतेय माळीण
कुठे गुडूप किल्लारी
कुठे तहानेने व्याकूळ
होई उध्वस्थ गोकूळ ||४||

असं माणसाचं जिण
जरा रहावेस जपून
माणसातील माणसा
कर पशूपक्षी सांभाळ ||५||

— विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि. बीड
मो. ९४२१४४२९९५

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..