सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति
वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती ।।१।।
विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली
समजोनी जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।।
मनाची सबलता हेच शक्तीचे मापन
काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।।
सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी
जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com


Leave a Reply