नवीन लेखन...

दृष्टांत कलियुगाचा

सारेच संवाद व्यवहारी
आपलेपण उरले नाही
निष्ठुर कर्तव्य भावनां
ओलावा प्रेमाचा नाही

चिंतेत, जग गुरफटले
स्वास्थ्य कुणास नाही
विवेकी विचार लोपले
जीव्हाळा उरला नाही

सर्वत्र भोगवादी वृत्ती
सुखशांती उरली नाही
हेच वास्तव जीवनाचे
जगणेच कळले नाही

उलघाल मनभावनांची
साशंकता संपली नाही
अर्थ जगण्याचे बदलले
मानवताच उरली नाही

स्वसुखासाठी धडपड
प्रेमास्थाच जीवनी नाही
हा दृष्टान्त कलियुगाचा
इथे कुणी कुणाचे नाही

— वि. ग. सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र. १४३.

२७ – ५ – २०२२.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..