नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – अनुमती

एखाद्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती (जीवलग माणूस) जेव्हा अडचणीत असेल त्यावेळी त्याचा सोबती किंवा जीवश्च-कंठश्च म्हणून त्याला वाचवण्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जातात. पण एवढं करुनही ज्यावेळी “ती व्यक्ती” कोणताच प्रतिसाद देत नाही तेव्हा तीचा जीवलग निराश, हाताश होऊन शेवटी हतबल होतो. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात ही घडणारे असे अनेक प्रसंग असतात.

या चित्रपटाला अशाच कथेचा बाज मिळाल्यामुळे व सामान्य माणसाची व्यथा मांडल्यामुळे “अनुमती” हा चित्रपट आपल्यातलाच वाटत राहतो. रत्नाकर (विक्रम गोखले), यांची पत्नी (नीना कुलकर्णी) ब्रेन हॅम्रेजमुळे (मृत्युशयेवर) पडून आहे. तीच्यावर उपचार करुन सुद्धा फारसं काही हाती लागणार नाही हे माहित असूनही तिला वाचवण्यासाठी हवा तो प्रयत्न करणार्‍या प्रसंगी घर, जमीन, गहाण ठेवून, विकून त्यातून जो काही पैसा मिळेल त्यामधून तिला वाचवण्यासाठी मार्ग असेल, हे सर्व अगदी उत्तम प्रकारे उभं करण्यात आलं आहे, आणि विशेष म्हणजे विक्रमजींनी ही भूमिका समजून घेऊन अगदी जीव ओतून अभिनय साकारला असून चित्रपट पाहताना “हृदयस्पर्शी” वाटत राहतो; अर्थात याचं श्रेय हे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्याचबरोबर चित्रपटात विक्रम गोखलें सोबत असलेले नीना कुलकर्णी, रीमा, सुबोध भावे, नेहा पेंडसे, किशोर कदम सारखे सहकलाकार यामुळे त्याच्या भूमिकेला सर्वांनी साथ दिल्याचं जाणवतं. आणि अरुण नलावडे, आनंद अभ्यंकरांच्या पाहुणे कलाकारांची भूमिका सुद्धा नोंद घेण्यासारखी आहे. विशेष म्हणजे सई ताम्हणकरची विक्रम गोखलेंची सून म्हणून असलेली भूमिका त्यातील साधेपणा व वावर अगदी उत्तमपणे रेखाटला आहे. काही निवडक प्रसंगापूर्ती आणि रत्नाकर यांच्या आखणीतील बायको म्हणून नीना कुलकर्णींनी तडीसतोड अभिनय केला आहे. त्यामुळे एका गृहिणीची छबी व स्वत:च्या पतीला जीवापाड पत्नीची त्यांची व्यक्तिरेखा पडद्यावर अधोरेखित होते. किशोर कदम यांचा “कोंकणी माणूस” तशी बोली व राहणीमान ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला पूरक आहे. कुठेही अभिनयात हा चित्रपट कमी पडत नाही उलट कथा पाहताना तो आपल्याला एकाजागी खिळवून ठेवतो. कथेचा विषय, संवाद, पार्श्वसंगीत, छायाचित्रणाची बाजू, गीतं, गायक, या बाजू ठीकपणे पेलल्या आहेत.
पटकथेची बाजू काहीशी मूळ विषयापासून भरकटल्यामुळे अधनं मधनं चित्रपट भरकटल्यासारखा वाटत राहतो, पण “फोकस” हा रत्नाकर या व्यक्तीरेखेवर राहिल्यामुळे चित्रपटात उत्कंठा मात्र वाढत राहते; संकलन व तांत्रिक बाजूंमध्ये घोळ झाला आहे जो टाळता येऊ शकला असता, चित्रपटातील काही प्रसंगांमधून आजूबाजूच्या व्यक्तींचं सतत कॅमेराकडे सतत पहात राहणं त्यामुळे सहाजिकच लक्षात येतं की “सिनेमाचं शूट सुरु आहे” हे सहजरित्या टाळता आलं असतं. एका गाण्याच्या प्रसंगामध्ये गजेंद्र अहिरे ट्रेनमध्ये लोककलाकारांच्या भूमिकेत दिसतो, त्या गाण्यातनं पहिल्यांदा मनोरंजन किंवा आशय पोहोचतो, पण दुसर्‍यांदा तसाच प्रसंग दाखवण्याची खरंच गरज होती का? असा प्रश्न सुद्धा प्रेक्षकांच्या मनामध्ये उभा राहतो. एवढा अपवाद जर टाळता आला असता तर चित्रपट कदाचित आणखीन लक्षवेधी ठरला असता, पण तरीही रत्नाकर यांची व्यक्तीरेखा विशेष म्हणजे सामान्य माणसाची मनोव्यथा, त्याचा संघर्ष अचूकरित्या साकारल्यानं राष्ट्रीय पुरस्कार सवोत्कृष्ट अभिनयासाठी का प्रदान केला आहे हे लक्षात येईल.
आपल्या जीवलगावर प्रेमाची व्याख्या विस्तृत करण्यासोबतच वैद्यकीय, सामाजिक व्यवस्था, नातेसंबंध, आपली माणसं परकी होताना, आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य माणसाची कहाणी सांगणार्‍या तसंच उत्तम निर्मिती मूल्यांपैकी हा चित्रपट पाहण्याजोगा आहेच त्यासाठी दिग्दर्शक आणि विक्रम गोखले यांचं अभिनंदन हे केलंच पाहिजे. कारण बर्‍याच अवधी नंतर रुपेरी पडद्यावर काळजाला भिडणारी सशक्त कथा दाखल झाली आहे, तेव्हा प्रत्येकांनी किमान एकदा तरी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन पहायला पाहिजे असं “अनुमती” च्या निमित्ताने सांगावं लागेल.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..