चिऊताई आणि मानवाचा संबंध फार जवळचा असावा. निदान आपल्या भारतीय संस्कृतीत तरी तो फार जवळ्चा आणि लिव्हाळ्याचा असल्याच जाणवत. म्ह्णूनच तर आपण चिमणी सारख्या छोट्याश्या निरूपद्रवी पक्षालाही आपल्या ताईची उपमा देतो. भारतीय सभ्यतेत ताईच स्थान हे आईच्या तोलामोलाच मानल जात हे वेगळ सांगायला नको. असं असतानाही आपली संस्कृती ज्या चिऊताईला आईच्या तुलनेच मानत आली त्या चिऊताईच अस्तित्वच आज धोक्यात असल्याच वाचनात आल आणि बरीच वर्षे विस्मरणात गेलेल्या चिऊताईची अचानक आठवण झाली. त्यामुळे आमच्या बाळ्पणीच्या आठवणीही जाग्या झाल्या. वीस-एक वर्षापूर्वी आजच मुंबईतील गोरेगांव हे खरोखरच गावासारखच होत. त्यावेळी आमच गांव आणि गोरेगांव यात आंम्हाला फारसा फरक जाणवत नव्हता म्ह्णूनच आंम्ही आमच्या गावापासून दूरावलो ते कायमचेच. त्याकाळी गोरेगावातील आमच्या झोपडीच्या आजूबाजूला बरीच मोकळी जागा होती त्याकाळी आमचा आणि निसर्गाचा फारच जवळ्चा संबंध होता. आता कोणाला खरं वाटणार नाही. पण साप, विंचू अगदी घोरपडीसारखे प्राणीही आंम्ही प्रत्यक्ष हाताळलेत. त्याकाळी संध्याकाळ होईपर्यत आंम्ही पतंग उडवत राहायचो एकदा का चिमण्यांचा थवा आपल्या विसाव्याच्या ठिकाणी जाताना दिसला की आंम्ही आमच्या पतंगाचा मांजा गुंडाळायला घ्यायचो. अंगणात पडलेले दाणे, आणि खाऊ खायला चिऊताईन येण यात आमच्यासाठी नवळ वाटण्यासारख काहीच नव्ह्त. त्यावेळी लहान मुलांनी चिऊताईला अंगणात खायला घालण आणि त्यांनी ते खाण अथवा त्यांच घरात मोकळेपणाने वावरण सार नित्याच होत.
— निलेश बामणे
Leave a Reply