नवीन लेखन...

चांदण्याना पण साथ हवी असते चंद्राची

चांदण्याना पण साथ
हवी असते चंद्राची,
सरिता अंतिम सागरात
हळुवार विलीन होते.
मग स्त्रीला पण हवी
असते गरज पुरुषाची..
अपूर्ण आहे दोघे एकमेकांशिवाय,
खरं स्त्रीत्वाचे अनेक नाजूक
पैलू पुरुषाला खुणावतात..
मग स्त्रीला पण खुणावत असतात
पुरुषातील पुरुष सौंदर्य असतं, ते म्हणजे
पुरुष जिगर, हिम्मत, पुरुष बाणा!
अनादीअनंत काला पासून हे
चक्र चालू आहे…
ह्या भाव विभोरातून तो निलवर्णी सावळा
कृष्ण पण सुटला नाही ..
तर मग आपल्या सारख्या
सामान्य लोकांनी ह्या विभोरात
फक्त झोकून द्यायचं…
ह्या जाणिवेत गुंतून जातो पुरुष,
आणि स्त्री पण गुंतून जाते..
भावना आणि मन नाजूक
झालं की जाणिवा बद्ध होतात,
गुंतलेल्या भावनांना सोडणं
की धरण हे भाव विभोरावर असतं..
पण सत्य हेच की गुंतल जातं
त्याला मन म्हणतात..
आणि भावना उत्कट होतात
तेव्हा मन एकमेकांत जुळतात..
स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय
अपूर्ण हे सत्य अंतिम ठरतं…
मग त्या उत्कट भावनेत वाटा
गंधाळल्या तर दोघेही बरोबर
किंवा दोघेही चूक…
एक भाव आणि एक मन
ह्यांच हितगूज म्हणजे एक
स्त्री मन आणि एक पुरुष भाव
यांचं उत्कट गंधित मनोमिलन..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..