भारतीय संस्कृतीमध्ये बंधुप्रेम, भगिनीप्रेम या भावनांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. एकाच आई-वडिलांच्या पोटी आलेल्या या मुलांमध्ये निसर्गत:च प्रेम आणि आपुलकी निर्माण होते असं आपण समजतो.बंधुप्रेमाचा आदर्श म्हणून राम आणि लक्ष्मण, राम
आणि भरत आपल्या मनावर ठसलेले आहेत. याच्या विपरीत उदाहरण म्हणजे महाभारतातील एकाच कुळातले बंधू! भावंडातील मत्सराची एक भयंकर कहाणी बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटमध्येही आहे. यात केन याने आपल्याच एबेल नावाच्या भावाचा खून केला. कारण काय? तर दोन भावांतील वैमनस्य. […]
स्त्री-पुरुष संबंधांचा व त्यांच्यातील नात्याचा गाभा काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे आणि अजूनही करत आहेत. स्त्री-पुरुषांचे शारीरिक मीलन अपत्यप्राप्तीपर्यंत जाते. म्हणून त्यांच्यातील नाते नैसर्गिक आहे, अशी पुरुषी समाजाची धारणा असते. पण जे नैसर्गिक आहे, ते नैतिक कशावरून? स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक अवस्थेत परिपूर्ण असू शकत नाहीत. त्यावर प्रेम, आदर, समानता हे संस्कार झाले, तरच ते नैतिक होतात. निव्वळ नैसर्गिक संबंध ही प्रकृती आणि अनैसर्गिक मार्गाने मिळालेले सुख ही विकृती होय. पण जेव्हा या संबंधांवर प्रेम, विश्वास आणि आदर याचा साज चढवला जातो, तेव्हाच ती संस्कृती ठरते. […]
खान्देशात श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव साजरे केले जात असतात. त्यातील प्रमुख उत्सव खान्देशवासीयांची कुलस्वामिनी कानुबाईचा उत्सव होय. श्रावणातील पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी दुसर्या किंवा चौथ्या रविवारीही कानुबाईची स्थापना केली जाते. संपूर्ण खान्देशात कानुबाईची स्थापना करण्याची पारंपरिक पद्धत आहे. कानुबाईचा उत्सव हा तसा दोन दिवसांचा असतो, मात्र, पाच दिवसांत कानुबाईचे रोट (प्रसाद) खावा लागत असतो. […]