नवीन लेखन...

कायदेविषयक लेखन

तात्पुरता सदस्य

तात्पुरता सदस्य म्हणजे नेमकं काय? त्या संदर्भातील इत्थंभूत माहिती देणारा हा लेख. […]

इच्छापत्र… काळाची गरज

निवृत्तीचे मिळालेले सर्व पैसे आपल्या मुला/ मुलींच्या नावावर केल्यावर पश्चाताप करणारे बरेच वडीलधारी व्यक्तींबाबत आपण वर्तमानपत्र/ चित्रपट/ नातेवाइक/ शेजारी/ प्रवासात भेटणारी व्यक्ती इतकेच नाही तर काही नाटक आणि टीव्ही वरील मालिकांमध्येसुद्धा आपणास पाहण्यात/ वाचण्यात/ ऐकण्यात येतात, त्याचे प्रमुख कारण आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्याची संख्यासुद्धा आपल्याकडे कमी नाही. तरीही प्रत्येक व्यक्तीला असेच वाटत असते की, मला इच्छापत्र/ मृत्युपत्र करण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये इच्छापत्र का/ कोण/ कसे करावे या बाबत माहितीपर लेख आपल्यासाठी. […]

इच्छापत्राचे प्रोबेट करणे भविष्यात गरजेचे आहे का ?

सर्व सामान्य नागरिकांना कायद्यातील तरतुदींच्या समजापेक्षा, गैरसमजच अधिक असतात. अशा चुकीच्या समजुती भविष्यात त्यांना मोठया अडचणीत आणू शकतात. तेव्हा योग्यवेळी कायदेशीर सल्ला घेतल्यास मौल्यवान वेळ वाचण्यास नक्की मदतच होईल. […]

कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र याबाबतचे समज आणि गैरसमज

सर्व सामान्य नागरिकांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक कायद्यातील तरतुदी. ह्या तरतुदी अत्यंत किचकट असून भारतात हिंदूंसाठी (बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मण समाज,आर्यसमाज, नंबुद्री, लिंगायत) ‘हिंदू वारसा कायदा’, मुस्लिमांसाठी‘मुस्लिम वारसा कायदा’ तर पारसी, ख्रिश्चन, अंग्लो इंडियन आणि इतर सर्व धर्मियांसाठी ‘भारतीय वारसा कायदा’ यातील तरतुदी पहाव्या लागतात. […]

मानीव अभिहस्तांतरण

मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया किचकट असल्याने त्याला गृहनिर्माण संस्थाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून थंडावलेल्या या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला आहे आणि सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्रराज्य, पुणेयांचे मार्फत दिनांक १ जानेवारी, २०२१ ते १५ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये मानीव अभिहास्तांतरित विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे . […]

सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना होणारा त्रास

अनेकदा झालेले बदल हे सभासदांपर्यंत पोहचत नाहीत. अपूर्ण माहिती असल्याने व सोसायटीचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असल्याने, सदस्याना त्याचा त्रास होत असतो. यावर सेक्रेटरी चेअरमन आणि उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण कार्यालयाकडून उलट-सुलट दिली जाणारी उत्तरे यावरून अनेक नागरिक हैराण परेशान असतात. […]

मराठी पाट्या

भाषेच्या राजकारणात नेहमीच भारतीय भाषेचा बळी जातो. इंग्रजीच्या वर्चस्वाबद्धल कोणीच काही ब्र शब्द उच्चारीत नाही कारण सर्वसामान्या पेक्षा राजकारणी,संस्थाचालक,नोकरशहा व शहरी लोक इंग्रजीला शरण गेले आहेत. अशावेळी भारतीय भाषेचा विकास करण्याची जबाबदारी भारतीय भाषा प्रेमी यांची आहे. […]

‘निर्भया’ला न्याय!

निर्भया प्रकरणाचे वैशिष्ट्य हेच की ती एक अपवादात्मक घटना राहिली नाही तर देशभरात महिलांवरील अत्याचाराची ती एक प्रतीकात्मक विषय बनली. या घटनेमुळे देश जागृत झाला, कायदे कठोर झाले, शिक्षेची परिभाषा बदलली. त्यामुळेचं निर्भया प्रकरणातील चार दोषींना फाशी दिल्यानंतर नुसता निर्भयाला न्याय मिळाला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण जनतेच्या दुःखावरही मलमपट्टी झाली आहे. मात्र, जखम पूर्ण बरी झाली का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपल्याला शोधावे लागणार आहे..! […]

सुरक्षा सामान्य माणसांची, सरकारी आणि खाजगी संपतीची

गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था,अनेक राजकिय पक्ष जबाबदार आहे.टीव्ही मिडीया,सोशल मिडीया, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विना कारण अतिरेकी प्रसिध्दी देतात आणि एकच एक दृष्य, फोटो सतत दाखवली जातात. या प्रकारचे वृत्तांकन थोडक्या शब्दांत न करता सतत तेच ते दाखवून त्यात तेल ओतण्याचे काम का केले जाते?.हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरुन काढुन पान आठवर नेले पाहिजे. […]

1 2 3 4 5 6 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..