नवीन लेखन...

उद्योग जगतातील घडामोडी याविषयी लेखन

दादर, मुंबई येथील ‘धी गिरगांव पंचे डेपो प्रायव्हेट लिमिटेड’

मुंबईतील मराठी माणसांच्या उद्योग-व्यवसायात ९० वर्षांची परंपरा असलेले “दि गिरगाव पंचे डेपो प्रा. लि.” हे दुकान अग्रभागी आहे. मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दुकानात मराठी माणूस खरेदीसाठी दूरदूरच्या ठिकाणांहून येतो. देवीच्या साड्या हे “गिरगाव पंचे डेपो”चे खास वैशिष्ट्य. याचबरोबर इतरही सूती कपडे, खासकरुन मराठी ग्राहक आणि कुटुंबांमध्ये वापरले जाणारे कपडे यांच्या व्यवसायात “गिरगाव पंचे डेपो” […]

कोयना जलाशयावर तरंगत्या सौरउर्जा पॅनेलच्या माध्यमातुन उर्जानिर्मिती

सह्याद्री पर्वताच्या रांगामधुन वाहणाऱ्या कोयना नदीवर कोयनानगर, सातारा येथे “कोयना धरण” सन १९६४ मध्ये बांधण्यात आले आहे. या धरणाचा मुख्य उद्देश जलविद्युत निर्मिती करणे हा असुन या प्रकल्पाची स्थापित जलविद्युत क्षमता १९२० मेगावॅट एवढी आहे. देशातील पुर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये कोयना प्रकल्पाची क्षमता सर्वात जास्त आहे. आता कोयना धरणामुळे निर्माण झालेल्या ८९१ वर्ग किलोमीटर क्षेत्रावरील जलाशयावर […]

समतेचे आद्य प्रवर्तक संत रविदास महाराज

संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्‍या आहेत. रविदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. […]

‘उत्कर्ष प्रकाशन’ चे सु. वा. जोशी

वर्ष १९५७… वाईजवळच्या धोम गावातून पुण्यात आलेला एक शाळकरी मुलगा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर रद्दी आणि काही जुनी पुस्तके घेऊन बसू लागला. त्यातूनच पंचवीस रूपये भाड्याने टपरी घेतली. पुढे जुन्या पुस्तकांच्या विक्रीबरोबरच नवी पुस्तकेही विकण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. होताहोता पहिले पुस्तक प्रकाशित केले आणि ही वाटचाल तब्बल पन्नास वर्षे करीत तो आज आघाडीचा पुस्तक प्रकाशक व […]

देशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव

देशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे. रामणवाडी (ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या गावात ८० देशी गाई आहेत. […]

दारावर भाजी महाग का?

हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे. तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही.  आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर  भाजी विकत घेते.  भाजीवाला जवळपास  राहणारा आहे.  हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी सजवून संध्याकाळी ५ ते रात्री […]

बाजीराव-मस्तानी आणि मराठी अलंकार

बाजीराव-मस्तानी हा बिग बजेट हिंदी चित्रपट यावर्षीच्या चित्रपटांमधील एक भव्य-दिव्यपणे प्रदर्शित झालेला आहे. यात बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचे चित्रण केले आहे. मराठी अलंकार हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. या पेशवेकालीन अलंकारातून त्यावेळच्या संस्कृतीची ओळख होते. या अलंकारांच्या निर्मितीसाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पी एन गाडगीळ अॅन्ड सन्स” यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आणि ती त्यांनी सार्थपणे […]

मॅनेजमेन्ट कन्सल्टन्सीतील आगळ्यावेगळ्या सौ.धनश्री जोग

उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत मराठी माणुस एकुणच मागे आहे हे आता सगळेजण जाणतातच आहेत. पण आता या क्षेत्रांत मराठी महिला धडाडिने पुढे येत आहेत असे सुखद चित्र निर्माण होऊ लागले आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रांत आज मराठी नव्हे तर इतर महिला मोठ्या प्रमाणावर आघाडी घेत आहेत. अनेक मोठ्या उद्योग व्यवसायाच्या प्रमुखपदी महिला आहेत आणि त्या सक्षमतेने कारभार चालवीत […]

हिम्मते मर्दा….

‘धंदा म्हटला म्हणजे तो बुडणारच! धंदा म्हणजे अळवावरचे पाणी! ज्याला नेकरी मिळत नाही तो धंद्यात पडतो!’ उद्योग व्यवसायाविषयी मराठी समाजात अशी विचित्र मनोवृत्ती असल्याचे मला आढळून आले आहे. इतर जमातीत उद्योग व्यवसाय असलेल्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. आपल्याकडे मात्र अशा कुटुंबात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. अजुन तरी या मनोवृत्तीत विषेश फरक […]

मेक इन इंडिया, स्थलांतर आणि भारतातील सरकारी कंपन्या !!!!

ऐअर इंडिया डब घाईला आलेली आहेच पण त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठी कंपनी भेल सुद्धा गेली ५ वर्षे सातत्यानी कमी नफ्यात चालत आहे .२०१२ साली या कंपनीचा निव्वळ नफा ७०३९ कोटी रुपये होता .तो दरवर्षी घसरत मार्च २०१५ मध्ये १४१९ कोटी रुपये इतका घसरला.सरकारी कंपन्यांची हि अवस्था का होत आहे याचे उत्तर खरे तर नव्या सरकारनी […]

1 3 4 5 6 7 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..