नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आहारातील बदल भाग ४६-चवदार आहार -भाग ७

आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ? आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे. आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते. शिल्लक काय रहाते ? जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते. मागे […]

हिशोब….शुद्ध खाद्यतेलाचा

मला अजूनही उमगले नाही,.. शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात… 1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात…हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240… 3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला. मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो…. एकूणच […]

आहारातील बदल भाग ४५ – चवदार आहार -भाग ६

लवण रसाचा युक्तीने वापर केला तर तो प्रिझरवेटीव्ह म्हणून वापरता येतो. म्हणून तर लोणच्यामधे मीठ जास्त घालतात. मीठाला कधीही कीड लागत नाही. हा त्याचा एक चांगला गुण. मीठाप्रमाणेच खायचा चुना देखील कीटनाशक आहे. मीठातील हा गुण ओळखून मासे टिकवण्यासाठी, सुकवण्यासाठी मीठाचा वापर होतो. कैरी, लिंबू मिरच्या टिकवण्यासाठी सुद्धा मीठच वापरले जाते. कोकणात कच्च्या फणसाचे गरे मीठ […]

आहारातील बदल भाग ४४ – चवदार आहार -भाग ५

जीभेला लागताक्षणी डोळे बंद करायला लावणारी, आणि अंगावर रोमांच उभे करणारी, आंबट पदार्थाबरोबरीची ही एक समाजमान्य चव. लवण म्हणजे खारट चव ! नावडतीचे मीठ अळणी, म्हणणारा हा डाव्या हाताचा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. मीठाशिवाय आमटी भात, भाजी ही कल्पनाच करवत नाही. चव वाढवायला हा लवणरस फार मदत करतो मीठाशिवाय पेरू, मीठाशिवाय आवळा, चिंच, बोरे. छे ! […]

गोमुत्राचे फायदे

भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच […]

‘दीर्घायु’चे रहस्य…आयुर्वेद !!

कोणाही थोरामोठ्यांना वाकून नमस्कार केला की; ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद कानावर पडत असतात. दीर्घायुची आस नसलेला मनुष्य विरळाच. आपल्याकडे चार युगे सांगितली असून प्रत्येक युगात १/४ आयुर्मानाचा ऱ्हास होतो असे आयुर्वेद सांगतो. हा ह्रास होत होत; कलियुगात १०० वर्षे ही सरासरी आयुर्मानाची परिभाषा आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्या देशात काय परिस्थिती आहे? भारत सरकारच्या जनगणना विभागाने जाहीर […]

आहारातील बदल भाग ४३ – चवदार आहार -भाग ४

आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले. बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ? होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना. म्हणजे […]

संतुलित आहार

कोणत्याही माणसाची आयुष्यात माफक अपेक्षा असते कि, माझे जीवन सुखी, आनंदी असावे. मग सुखी जीवनासाठी निरोगी शरीर अतिमहत्वाचे ! […]

1 123 124 125 126 127 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..