नवीन लेखन...

ढोबळी मिरची

भारतात आपल्याकडे ढोबळी मिरची फार प्रसिद्ध आहे. आपण त्याला काही लोक सिमला मिरचीसुद्धा म्हणतात. ही मिरची का आली, कशी आली अथवा कुठून आली, हे सांगणे कठीण. काहींच्या मते ही मिरची दक्षिण आशिया खंडातून आली. साधारण १५३० साली ब्रिटनला ही झाडे आली. मात्र अरब लोकांनी ही झाडे लावली व त्याला हिरवे शेत असे म्हणू लागले. काही लोकांच्या मते ही मिरची इराणमधून आली आणि ती भारतात अवतरले. मात्र चीन आणि काही झाडे भारतानेही लावली. ती थेट नेपाळपर्यंत पोहोचली. साधारण १८२७ काळात ही झाडे इटलीच्या सिसीली भागात सापडली. मिरच्यांचे चव व रंग पाहून अनेक जर्मन लोकांनी याचा व्यापारच सुरू केला. मात्र फ्रान्समध्ये असताना फ्रान्सची राणी कॅथेरीन या भाजीच्या प्रेमात पडली. कॅथेरीन हि आपल्या प्रत्येक जेवणात अशी भाजी असलीच पाहिजे, असा दंडक ठेवला. फ्रान्समध्ये राणी असताना, मिरचीमध्ये ‘राणी बोले अन् प्रजा हले’ आणि जो तो कॅस्पीकमचा वापरू लागला.

एक गोष्ट खरी की, कॅस्पीकमला हा भाग अत्यंत पौष्टिक होता. ढोबळी जीवनसत्त्व ए, सी, ई, के, मॅग्नेशियम, फॉलिक अॅसिड, ब्रिटेन, लोह, बीट, चुना, पोटॅशियम, तांबे, प्रथिने, झिंक अशी अनेक गुणधर्म सापडले.

मात्र आयर्न हा भाग जरी आपल्या पोटामुळे शरीरात मिसळत नाही आणि त्याकरिता व्हिटॅमिन सी ची सोय केली जाते.

सिमला मिरचीमध्ये भरपूर चुना (कॅल्शियम) असते. मात्र ते शरीरात विरघळण्यात बराच वेळ जातो. सिमला मिरचीचा आवश्यक वापर करावा. त्यामुळे हाडांची वाढ चांगली होते. तसेच लहान मुलांना हाडे सडपातळ होऊन रक्त प्रवाह सुरळीत चालतो. लहान मुले अथवा मोठी माणसे यांना जर दातांचा त्रास अथवा रक्त येत असल्यास गाजर व सिमला मिरची घ्यावी त्वरित आराम मिळतो. तसेच मुत्राशयाचा त्रास होत असल्यास सिमला मिरची खूप फायदेशीर असते. तसेच सिमला मिरचीने श्वसनक्रियांचा त्रास त्वरित बरा होतो. नेहमीच अॅसिडीटी होत असल्यास सिमला मिरची न उकडता रस काढून तो अगदी लहान प्रमाणात द्यावा, आराम मिळतो. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता अथवा गर्भवती स्त्रिया यांना सिमला मिरचीचा वापर चांगल्यारितीने करणे आवश्यक आहे. सिमला मिरचीवर कीटकनाशक जंतू असतात. आणि या मिरच्या स्वच्छ करून त्याचा वापर करावा, नाहीतर शरीराला घातक ठरते. सिमला मिरचीचा आवश्यक उपयोग करावा.

सिमला मिरचीचा अनेक वैद्यकीय दृष्ट्या बराच फायदा होतो. सिमला मिरची आरोग्यदृष्टा फारच गुणकारी आहे. शरीरात रक्तप्रवाह कमी असेल व त्या व्यक्तीला पंडूरोग (अॅनेमिया) झाला असल्यास रक्तात सुधारणा होते व रक्तप्रवाह नियमित सुरू होतो. तसेच चुना असल्यामुळे हाडे बळकट होतात. सिमला मिरचीचे सूपही फार चवदार व पौष्टिक असते.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..