नवीन लेखन...

बोरा केव्ह्ज – एक अदभूत निसर्ग निर्मित अचंबित करणारे स्थळ

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र प्रदेश राज्याचे विशाखापटटम हे एक महत्वाचे बंदर, तेथून थेट उत्तरेला ओडीसा व छत्तीसगड पर्यंत पसरलेल्या पर्वतरांगा.त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीला एक अनोखे रमणीय सौदर्य आहे,

या पर्वत रांगात विशाखापटटम ते अराक्कू VALLEY असा १३० किमी निसर्गरम्य घाटाचा रस्ता असून त्यावर अराक्कूच्या आधी ३५ किमी अंतरावर अनन्थगिरी डोंगररांगात २३१० फुट उंचीवर भारतातील सर्वात मोठी जमिनीखाली गुहा आहे. BORA CAVES म्हणजे निसर्गाचा अदभूत चमत्कारचआहे ओडीसा भाषेत त्याला बोरा गुहालु म्हणतात. ( बोरा म्हणजे मोठे भोक, गुहालु म्हणजे गुहा. गुहा ही काही दशलक्ष वर्षा पासून अस्तित्वात आहे.

British Geologist Wlliam King George working for geological survey of india discovered this cave in 1807. या गुहेच्या आजू  बाजूच्या जंगलातील लहान लहान खेड्यात जालापी,पुर्जा,वाल्मिकी जातीचे आदिवासी हजारो वर्षापासून राहत असत,या गुहेच्या पठारावर भरपूर गवत उगवत  होते,तेथे या आदिवासी जमाती मधील गुराखी आपल्या गाईना चरण्यासाठी येत, एकदा चरत असताना एक गाय एकाएकी पठारावरील मोठया भगदाडातून थेट २०० फुट खाली पडली,गुराख्याने भगदाडातून खाली वाकून पाहिले तर गाय जिवंत होती,खाली उतरल्यावर तेथे एक शिवलिंग दिसले, त्यामुळे गाय वाचली तेंव्हापासून गावकरी खाली उतरून शिवलिंगाची उपासना करू लागले पण खोल एक गुहा आहे हे मात्र त्यांना माहीत नव्हते.या गुहेच्या उत्खननात ४० हजार वर्षापूर्वीची दगडी हत्यारे मिळाली आहेत, तेंव्हा प्राचीन मानवाची तेथे वस्ती होती.

गुहेतील दगडात calcium carbonate चे प्रमाण प्रचंड असून त्याचे हवेतील बाष्पा मधील Humic acid  बरोबर मिश्रण तयार होते,व त्या मधून लांबचे लांब ओबड धोबड खांब तयार होतात.छता पासून जमिनी पर्यंत जाणार्या खांबांना –stallactiteव जमिनी पासून छता पर्यंत जाणार्या खांबाना –stalegmite म्हणतात.हे विविध आकाराचे,रंगीबेरंगी चकाकणारे खांब म्हणजे हजारो वर्षे अखंड चालणारी महान नैसर्गिक प्रक्रिया आहे.

गुहेत गोस्थानी नदीचा उगम आहे.(गोव्ह –गाय,स्थान-आचळ ) विशाखापटटम जिल्ह्यातून वाहत,त्या शहराला पाणीपुरवठा करत ती बंगालच्या उपसागराला मिळते.

गुहेचे भूशास्त्र ( Geology ):-

भारताच्या पूर्व किनार्या जवळील डोंगर रांगात हजारो वर्षापूर्वी भू रचनेतील दगडाच्या थरात प्रचंड उलथापालथ झाली,त्यतून ही दगडी गुहा तयार झाली, या घडणाऱ्या प्रक्रियेला (khondolitesuites) म्हणतात.

गुहेत पांढरे calcium carbonate चे पांढरे दगड, पिंगट रंगाचे अभ्रका सारखे दगड ( मायका ) तर नदीच्या पाण्यातील क्षार व दगडातील sulphur मिळून झालेले पिवळे दगड अशी विविधता जागोजागी दिसते.छतावरून लोंबणारे खांब ११ फुट लांब,२ फुट रुंद, तर जमिनीकडून छताकडे जाणारे खांब २० फुट लांब, ३ फुट रुंद, या सर्व खांबाचा घेर २ ते ३ फुट आहे.गुहेची उंची ४० फुट व खोली ६६० फुट आहे, प्रवेशद्वार रुंदी ३३० फुट तर उंची ७५ फुट आहे.तेथून थेट तळा पर्यंत जाण्यासाठी २६० पायर्या व रेलिंग आहे गुहेत २० ते २५ पिवळे , लाल हिरवे HALOGEN LAMPS असल्याने सर्व गुहा चकाकते.काही खांब तर पायर्यांच्या इतके जवळ आहेत, अगदी अंगावर आल्यासारखे वाटतात.पहिला टप्पा १५० फुटावर असून तेथे गेल्यावर गुहेची भव्यता जाणवते,छतावर १५ ते २० फुटाचे मोठे भोक असून त्यातून आत येणरया सूर्य प्रकाशामुळे भरपूर उजेड वरील भागात आहे.या जागी मोठा चौथरा आहे , जेथे  त्यामध्ये व्यवस्थित उभे रहाता येते, गुहेची भव्यता विविधता.पाहून मन थक्क होते. दगड व खांबांच्या आकारामुळे हुबेहूब काही आकार तयार झाले आहेत. मुख्य आहेत, शिवलिंग,आईच्या हातात असलेले बाळ,ॠषीची दाढी,माणसाच्या मेंदू सारखा गोळा, मगर, देऊळ , चर्च अचंबित करणारी जागा आहे.

मधे मधे छोटी पाणथळ असून त्या मधील पाण्यात sulphur चे प्रमाण ज्यास्त असून पाण्याच्या पृष्ठभागावर चिकट पडदाच तयार झाला आहे (Biofilm which contains cyanobacteria,algae, and fungi ) या सर्व जीवजंतूमुळे पिंगट, लालसर चटयाच तयार झाल्या आहेत.या मध्ये लोखंडाच्या क्षारांचे प्रमाण भरपूर असल्याने एक प्रकारची लालसर छटा बाजूच्या दगडावर पडलेली आहे.त्यातूनच रुबी समान छोटे पसरलेले दगड दिसतात.लोखंडाचे कण आणी जीवजंतू यांचा घनिष्ठ संबंध असून यावर सखोल संशोधन झालेले आहे. Andhra university has published lot of research papers on this subject.

गुहेत उतरताना क्षणा क्षणाला बदलणारे चित्र पाहून आपण मंत्रमुग्ध होतो.दगडांचे विविध आकार, रंगाची उधळण, हवेतील गारवा ( १६ से, तापमान )या सर्वांचा आनंद लुटता लुटता आपण तळाला कधी जातो हे कळतच नाही.ओतप्रत आनंदाने भरलेल्या मनापुढे इतक्या पायरया चढण्याचे शारीरेक श्रम जाणवत नाहीत निसर्गाचा अनोखा kaleidoscope  कायम स्मृतीत राहणार आहे.

विशाखापटटम ते अराकू हा १२५ किमी चा रेल्वे प्रवास म्हणजे रेल्वे प्रेमीना मेजवानीच आहे.या रेल्वे मार्गावर ५८ बोगदे, ८४ लहान मोठे पूल आहेत, विशाखापटटम येथून सकाळी ६.३० ला गाडी असून ती ११ वाजेपर्यंत आरकुला पोहचते. घाटातील धबधबे, deep valleys and lusty greenery चा आनंद लुटण्यासाठी गाडीला एक विशेष डबा जोडला जातो, जाला सर्व बाजूनी व छताला उत्तम पारदर्शक काचा आहेत (VISTADOME COMPARTMENT ) .या डब्याचे तिकीट महाग असूनही ३ महिने आधीच तिकीटे संपून जातात, इतका हा मार्ग लोकप्रिय आहे. वाटेत बोरा गुहालू  स्टेशन बोरा केव्ह्ज ला जाण्यासाठी आहे.हे अराकू च्या आधी ३५ किमी अंतरावर आहे.या रेल्वे  मार्गाला ( Dandkaranaya –Bolgiri –kibur /Kotayavalasa-Kirandul (K .K. LINE ) असे नाव असून ती चक्क बोरा केव्हज च्या वरून नेण्यात आलेली आहे.

अशा अनवट स्थळाकडे हौशी पर्यटकानी आपली पावले अवश्य वळवावीत.

— डॉ अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..