नवीन लेखन...

भारतीय शब्दकोषातील पंचांगे

पंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन खालील प्रमाणे;

१-खगोल घटना – यातील पांच अंगे म्हणजे वार, तिथी, नक्षत्र,योग व करण .
• वार- सगळ्यांनाच माहित असलेला –सोमवार ते रविवार – ७
• तिथि –शुक्ल पक्ष व कृष्णपक्षात प्रत्येकी १५, शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमा,कृष्ण प्रतिपदा ते अमावास्या -३०.
• नक्षत्र – २७- अश्विनी भरणी इत्यादि , प्रत्येक दिवशी कोणतेतरी नक्षत्र उदितमान असते.
• योग – २७-
• करण -६० अधिक माहितीसाठी कोणतेही पंचांग उघडून पहा.

प्राचीनकाली ग्रंथ केव्हा पूर्ण झाला हे या पांच गोष्टींनी व्यक्त करत कारण ह्याच पांच गोष्टी हजारो वर्षानी पून्हा एकत्र येण्याची शक्यता असते.

२- जीव शास्त्र (बॉटनी) – झाडाची मुळे, खोड,पाने,फुले व फळे यांना वृक्षाचे पंचांग म्हणतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये यांचा उपयोग होतो जसा शतावरीच्या मुळांपासून शतावरी सत्व, गिलोय सत्व –वेलीच्या दांड्यांपासून, रुईच्या पानांचा चीक, फुलांपासून गुलकंद, आवळ्यापासून च्यवनप्राश इत्यादि.

३-पंचलवण- आयुर्वेदात पांच प्रकारची लवणे (मीठे ) सांगितली आहेत, त्यापैकी तीन सर्वांच्या परिचयाची असतील.
• समुद्री लवण –समुद्राच्या पाण्यापासून बनवलेले , मीठागराचे मीठ जे आपण रोज स्वयंपाकात वापरतो.
• सौवर्चल लवण -सैधव मीठ- काळे मीठ, गंधकाचा वास व चव असलेले हे मीठाच्या खाणीत सापडते.
• रोमक लवण- सांबरलवण –राजस्तानच्या सांबर या खा-या पाण्याच्या तलावाच्या पाण्यापासून बनवलेले.
• औभिड लवण – खारट मातीपासून बनवलेले , आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरतात. .

४- पंचगव्य – गाईपासून मिळणारे पांच घटक –दुध, दही, तुप, गोमुत्र व गोमय . हिंदु लोक श्रावणीला या पंचगव्याचे सेवन धार्मिक विधी म्हणून करतात.

५-पंच मृदा- माती पांच प्रकारची असते, सुपिक माती , वारुळाची माती, गेरु, खडूची माती व क्षार माती (सलाईन). धातु वितळवण्यासाठी लागणा-या मुषा (कृसीबल) अशा मातीपासून बनवत असत.

६- पंचमहाभुते- पृथ्वी, आप (पाणी), अग्नि, वायु आणि आकाश. तैतरिय ब्राम्हण ग्रंथांत सर्वप्रथम ही संकल्पना आढळते. यापैकी कुठल्याही गोष्टीत प्रदुषण वाढले की पर्यावरण विघडते. या पंचमहाभुतांना देवता स्वरुप मानले गेले व त्यांच्या स्तुतीवाचक अनेक सुक्ते वेदांत आठळतात, जसे भूमि सुक्त, जल सुक्ते (आपोहिष्ठा, नदीसुक्त ) इत्यादि.

माणसाला ईश्वराने ११ इंद्रिये दिली आहेत त्यापैकी एक मन, पांच ज्ञानेंद्रिये व पांच कर्मेंद्रिये अशी एकुण ११ इंद्रिये. त्यापैकी मनाची व्याप्ती व शक्ती कोणालाच अजून कळली नाही.

७-पंचेंद्रिये (ज्ञानेंद्रिये) ज्यामुळे ज्ञान प्राप्त होते. जसे डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा . काही जनावरांची काही इंद्रिये मनुष्यापेक्षा आघिक कार्यक्षम असतात. जसे कुत्र्याची वास घेण्याची शक्ती, घार गरुड यांची नेत्रदृष्टी इत्यादि.

८-पांच कर्मेंद्रिये- या कर्मेंद्रियाकडून कार्य घडते, ती कर्मेंद्रिये अशी आहेत वाणी ,हस्त (हात) , पाद (पाय), पायु (मलमुत्र नि:सारण करणारी इंद्रिये) व उपस्थ (जननेंद्रीय) .

९- पंच आब –पांच नद्या-झेलम (वितस्ता) चिनाब, रावी, सतलज व बियास (व्यास). अशा पांच नद्या ज्या प्रदेशात वाहतात त्याला पंजाब असे नाहे.

१०- पंचलोह (पंचधातु) – हा मिश्र धातु मुर्ती किंवा अंगठ्या बनवण्यास वापरतात, यात सोने १ भाग,चांदी ४ भाग, शिसे ८ भाग, तांबे ८ भाग,व लोखंड ०.१ भाग,असे या धातुंचे मिश्रण असते .

११ –पंचरत्ने -१-हिरा, २-मोती, ३-माणिक ,४-पाचु व ५- नीलम अशी पंचरत्ने

१२- पंचांम्ल (अॅससिड )- पांच फळाचे रस -१-बोरे,२-डाळिंब, ३-चिंच, ४-लिंबु व ५- आमसुल

१३- पंचद्रावक – धातु वितळविण्याचे कामी येतात असे पांच सेंद्रिय (ऑरगेनिक ) पदार्थ . १-गुंज, २-टाकणखार, ३-मध, ४-तुप व ५-गुळ / काकवी

१४- पंचवायु – योगशास्त्रात मनुष्य शरिरातील पांच प्रकारचे वायु (हवा) असतात असे सांगितले आहेत. त्याबद्दलची माहिती खालिलप्रमाणे.

वायु शरिरातील ठिकाण शाररिक क्रिया
प्राण मस्तक व छाती प्राशन, स्फुर्ती, अग्रगती, चेतना
अपान मुत्रपिंड उर्ध्व्गती, अधोगती, निष्कासन
समान नाभि आंतर्शोष, स्थिरीकरण, एकत्रीकरण
उदान कंठ वृध्दी,वाणी, उच्चार , उर्ध्व्गती
व्यान संपुर्ण शरिर संचारण , प्रसरण

संदर्भ –

• रसार्णव – टीका इंद्रदेव त्रिपाठी ,चौखंबा प्रेस, काशी.
• हिंदु धर्माचा शब्दकोष –स्वामी हर्षानंद, रामकृष्ण मठ, बंगळुरू
• औषधी दर्शन –लेखक नाडकर्णी, धुतपापेश्वर प्रकाशन पनवेल, मुंबई

— प्रा. अशोक नेने
भ्रमण ध्वनी -8329509522

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..