नवीन लेखन...

बाबा

लग्न झालं अन् –
ती सासरी निघाली,
त्याची मात्र खूप –
घालमेल होऊ लागली.

काय होतंय नेमकं –
त्याला काही कळेना,
अस्वस्थपणा जीवाचा –
कमी कुठे होईना.

खूप वर्षांपूर्वीची ती –
आठवण जागी झाली,
तशीच एक बारीक कळ –
आता हृदयातून गेली.

आतली तडफड चेहेऱ्यावर –
उमटत नव्हती काही,
दुराव्याचे कढ मात्र –
फुटत होते तरीही.

तयारी झाली आणि –
जाण्याचा दिवस उजाडला,
सगळ्यांबरोबर तो ही –
निरोप द्यायला निघाला.

काहीबाही विचारत होता –
फार नव्हता बोलता,
त्या क्षणाचा विचार मनात –
करत राहिला होता.

गाडी आली आणि क्षण –
जवळ आला निरोपाचा,
अंधूक दिसू लागला –
त्याला चेहरा तिचा.

भरलेले डोळे आणि –
आठवणी मनात,
लेक लाडकी जात होती
दूर एका क्षणात.

गाडी हालली अन् –
हातही लागले हलायला,
प्रयासाने रोखलेले अश्रू –
आता लागले वाहायला.

धावावसं वाटतं होतं –
गाडीबरोबर त्याला
ओठ थरथरते बघत होते –
मनापासून बोलायला.

बाप होणं मुलीचा –
कठीण खूप असतं,
सासरी पाठवणी करताना –
हे फार जाणवतं.

सोडला फलाट गाडीने –
दूरवर ठिपका दिसू लागला,
त्याचवेळी तिचा बाप –
खूप एकटा झाला.

प्रासादिक म्हणे 

–प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..