नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

जीभेची कशी घ्याल काळजी?

आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते. दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. […]

श्वासाची दुर्गंधी

मौखिक अस्वच्छता हे श्वासाला दुर्गंध येण्याचे एक कारण असू शकते. किंबहुना दात, जीभ, हिरड्या यांच्या म्हणजेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे, हे श्वाेसाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण असते. काहीही खाल्ल्यानंतर दातात अन्नाचे छोटे मोठे कण अडकतात. तोंडातील जीवाणूंद्वारे त्या कणांचे विघटन होऊन दुर्गंधीयुक्त रासायनिक पदार्थ आणि वायू तयार होतात. या रासायनिक पदार्थांमुळे आणि वायूंमुळे तोंडाचा वास येऊ […]

संगणकीय आजार !

रोजचे संगणकावरचे काम हे आता जवळपास कुणालाच न टाळता येण्यासारखे आहे. सतत संगणकावर काम करुन करून अनेकांना मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतो. काहींचे डोळेही दुखतात. संगणकासमोर सक्तीने बसावे लागण्याचे तोटे आणि त्यावरचे काही सोपे उपाय. मानदुखीची कारणे अनेक असू शकतात. पण संगणकासमोर घालवलेला वेळ जितका जास्त, तितकी मानदुखी अधिक असे एक साधे समीकरण आहे. या मानदुखीसाठी […]

शरीराला आवश्यक खनिजं

आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाचं तसंच उपविभागाचं कार्य सुरळीत राहावं म्हणून त्यांना खनिजांची गरज असते. कारण शरीरातली प्रत्येक क्रिया मग ती रासायनिक असो किंवा हार्मोनल त्या प्रत्येक क्रियेत खनिजं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आपण जे अन्न सेवन करतो त्यात ही खनिजं नैसर्गिकरीत्याच परिपूर्ण असतात. आणि जे पदार्थ किंवा खनिजं शरीराला अनावश्यक आहेत ती मल- मूत्र किंवा घामावाटे शरीराबाहेर […]

वृध्दासाठी आहार

वय झाले की हलका आहार घ्यावा असे म्हणतात. पण असा आहार म्हणजे नेमके काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. हलक्या आणि तरीही पोटाची भूक भागवणाऱ्या काही पदार्थाविषयी जाणून घेऊ या. न्याहरी हे दिवसातले पहिले अन्न. न्याहरीला रोज काय वेगळे करावे, त्यातही घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना सोसेल आणि तेवढय़ापुरते पोटही भरेल, असा आहार कुठला, हे प्रश्न जवळपास प्रत्येक […]

अॅलर्जीपासून कसा बचाव करावा

सध्या थंडीचा पाठशिवणीचा खेळ यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे अशा विकारांना सामोरं जावं लागत आहे. अॅीलर्जी किंवा अस्थमा असलेले लोक बेजार झाले आहेत. जरासं हवामान बदललं की कित्येक जणांना सर्दीला सामोरं जावं लागतं. सध्या तर सतत ऊन आणि थंडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कित्येक जण या त्रासाचे बळी ठरत आहेत. म्हणून या मोसमात आपलं […]

हृदयविकाराचा त्रास जडलेल्या लोकांनी काय खावं ?

हृदय स्नायूंचं बनलेलं आहे. त्या स्नायूंचं वैद्यकीय नाव आहे ‘मायोकारबीयम’. हे स्नायू सतत आकुंचन पावत असतात. ‘कॉरोनरी आर्टरीज’ नावाच्या दोन शुद्ध रक्तवाहिन्या आणि त्यांच्या असंख्य शाखा तसंच उपशाखा यांच्यामधून हृदयाच्या स्नायूंना भरपूर रक्तपुरवठा सतत होत असतो. हृदयाला चांगला रक्तपुरवठा होण्यासाठी पौष्टिक पण संतुलित आहार रोजच्या खाण्यात आला पाहिजे. कोलेस्टेरॉल कोलेस्टेरॉल मेणासारखा मऊ पण रक्तात न मिसळणारा […]

आरोग्याकडे लक्ष

नवीन वर्षी नवी ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचं एक टार्गेटच आपण आपल्यासमोर ठेवतो. पण आरोग्याचं काय? असा प्रश्न उरतोच. स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात आपण आरोग्याकडे सरास दुर्लक्ष करतो. आरोग्याशी निगडीत काही खास टिप्स… दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावं. त्यामुळे त्वचेला तेज येतं. साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटं चालावं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक […]

अॅ निमिया किंवा रक्त्पांढरीवर घरगुती उपाय

पालक पालकामध्ये बी-12 हे जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. तसेच फॉलिक अॅ सिडचाही तो मोठा स्रोत आहे. त्यामुळे पालकाचे सेवन केल्यास रक्ताोची कमतरता भरून निघते. पालक सूप, पालकाची भाजी यांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. डाळिंब डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते. कार्बोहायड्रेट आणि प्रथिने यांचे प्रमाण डाळिंबामध्ये खूप जास्त असते. काही प्रमाणात लोह […]

घराच्या रंगात आरोग्याचा मंत्र

घराच्या भिंतीसाठी वापरण्यात येणारे रंग हे आपल्या मनावर जसा परिणाम करत असतात तसेच ते आरोग्यावरही करत असतात. त्यामुळे घराचे रंग हे पर्यावरणपूरक असायला हवेत. गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमध्ये अनेक बाबतीत जागरुकता येत आहे. जगभरातले ग्राहक ते वापरत असलेल्या उत्पादनांच्या दर्जाविषयी सतर्क असतात. भारतीय ग्राहकही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच देशात अनेक ग्राहक ते वापरत असलेली उत्पादनं पर्यावरणपूरक […]

1 394 395 396 397 398 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..