नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

ट्रेड युनियन्स् आणि संप

जागतिक आर्थिक मंदिमुळे देशात औद्योगिक व इतर क्षेत्रात मरगळ आली आहे. काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर बर्‍याच ठिकाणी कामगार कपात चालू आहे. आपला हट्ट पुरा करून हवे ते हवे तेव्हां पदरात पाडून घेण्यासाठी लहान मुले ज्या मानसशास्त्राचा वापर करतात त्याच प्रकारे आज सर्वच क्षेत्रातील ट्रेड युनियन्स् आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संपाचे तंत्र वापरताना दिसतात. प्रथम भारतात ट्रेड युनियन कशी आली ते बघू.
[…]

मुंबईत घर मिळेल का घर?

घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमंती/भाव गगनाला भिडल्याने घराच्या किंमती वारेपाम वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कुठेही घर घेणे सोपे नाही. त्यातून प्रत्येकाचे स्वप्न असते की माझे मुंबईत घर असावे. घर विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल किंवा स्वत:कडील पुंजी कमी पडते म्हणून बँकेतून कर्ज काढून घर घेण्याचेही धाडस होत नाही. कारण बँकांच्या व्याजाचे दर सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मुद्दल अधिक व्याज फेडण्यामध्ये उभ आयुष्य सरून जाईल.
[…]

मुंबईचे शांघाय करण्याआधी !

आज सरकार मुंबईचे शांघाय करण्याचा घाट घालीत आहे पण मुंबईत राहणाऱ्या काही नागरिकांच्या व सतत येणाऱ्या लोंढ्यांच्या नसानसात भिनलेला अस्वच्छतेचा निचरा कोण करणार? नागरिकांच्या मानसिकतेवर रत्यांची तसेच सार्वजनीक वाहानांची व ठिकाणांची स्वच्छता अवलंबून असते. स्वतंत्र भारताचे मंत्री, पुढारी व सुजाण नागरिक देशाच्या प्रमुख कार्यक्रमांच्या वेळेस सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या आणि कश्याकश्याच्या शपथा घेतात. समारंभ झाल्याझाल्या मंत्रीच रस्त्याच्या बाजूला पण तंबाखू किंवा गुटख्याची पिचकारी मारून शपथेला हरताळ फसताना आपण बघतो. निवडणुकींच्या वेळी शपथेवर दिलेली आश्वासने जशी सोईस्कररीत्या विसरली जातात तसेच हे. “गरज सरो आणि वैद्य मरो”.
[…]

कालाय तस्मै नम: !

विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधामुळे सगळ्या गोष्टी सहज व विनाकष्ट उपलब्ध झाल्याने माणूस जसा सुखी झाला तसा तो आळशी व ऐतोबा होऊन सवईचा गुलाम झाला. सवय ही काळ, वेळ व कारणांनी बदलत जाते. आज आपण पहातो सर्वच स्त्री व पुरुषांचे जीवन सवईमुळे बदलल्याने शारीरिक व्याधीत वाढ होताना दिसते. पूर्वी पैसा कमाविण्यासाठी घाम गाळायला लागायचा आता घाम गाळायला पैसा खर्च करावा लागतो यातच सर्वकाही आलं.
[…]

कळत न कळत

आपल्या आजूबाजूला वावरतांना नीट लक्ष देऊन ऐकाल व लक्षात ठेवालं तर कुठल्या ना कुठल्यातरी संधर्भात काही शब्द आपण वारंवार उच्चारताना पाहतो. अर्थात हे शब्द मुद्दामून वापरले जात नाहीत तर सहज ओठावर दररोजच्या चांगल्या का वाईट सवयींमुळे का शिष्ठाचाराने येतात हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे एवढे खरे. पण काही शब्द काळ, वेळ, कारण व प्रसंगाचे भान न ठेवता वापरल्यास अर्थाचा अनर्थ होऊन आपण एका चांगल्या मित्राची/मैत्रिणीची एवढ्या वर्षाची मैत्री गमाविण्याची पाळी येऊ शकते.
[…]

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने….

पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती […]

परमपूज्य देवास पत्र

आम्हांला कर्मस्वातंत्र्या बरोबर मन व बुद्धी दिल्यामुळे आंम्ही खुपच प्रगती केली आहे. परंतू आज पृथ्वीवर मानव सुखी व सामाघानी का नाही? का तो एकमेकांचे पाय खेचत असतो? मर्यादांचे पालन करताना दिसत नाही! मोहात पदोपदी अडकत असतो व इतरांना अडकवतो. आम्हांला वाटते की त्याला तू मन व बुद्धीचे रसायन दिलेस व त्यात भर म्हणून की काय कर्म स्वातंत्र्य दिलेस. अमर्याद कर्म स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थ व भोगावादासाठी असा काही उपयोग करून घेत आहे की तो आज स्व:लाच विसरला आहे की तो प्रथम एक माणूस आहे. आम्हांला दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचे आता अपचन होत आहे. जास्त खाल्ले की अपचन होऊन तब्बेत बिघडते व शरीरात जास्त वात होऊन त्याचा मन व बुद्धीवर परिणाम होतो. देवा खरंच सांगतो मानवाच्या मेंदूतील कर्म स्वातंत्र्य नावाचे व आपण देवाच्या वर नाही, श्रेष्ठ नाही याचे भान ठेवणारे स्मरणशक्तीचे PCB (Printed Circuit Brain (Board) बदलण्याची वेळ आली आहे. […]

आपण हे बदलू शकतो का?

आता आनंद, जल्लोष व उत्साहाने सण व उत्सवांना सुरुवात होईल. आपले सण व उत्सव मोठया आनंदाने आणि प्रेमाने साजरे केलेच पाहिजेत याबद्दल दुमत नाही. तरुणांत उत्साह आहे, पण त्याला शिस्तीची जोड कुठेतरी कमी पडते किंवा अतिउत्साहात तिचा विसर पडल्याचे सतत जाणवते. सण व उत्सवाचे पावित्र्य, महात्म्य, त्यामागील कार्यकारणभाव प्रकर्षाने व्यक्त होताना दिसतो परंतू त्याला स्पर्धात्मक, व्यापारी आणि राजकारणाची झालर असलयाचे जाणवते.
[…]

चित्रकार “पॅबल पिकासो”

बहुतेक कलाकार लहरी व आपल्याच विश्वात मग्न असतात त्याला चित्रकार अपवाद कसे असू शकतील. नावजलेल्या चित्रकारांची विविध वैशिष्ठये व पद्धती आकृत्या व रंगातून दिसतात. काहीना रंग आवडतात तर काहींना आकृत्या. काही चित्रकार रंग व आकृत्या अशा प्रकारे काढतात की त्यातून त्यांना एक स्टोरी किंवा घटनाक्रम सांगावासा वाटतो. काही चित्रकारांचे मन हळवे आध्यात्मिक तर काहींचे तर्हेव्हाईक असते.
[…]

कुणाच्या खांद्यावर, कोणाचे ओझे?

आज प्रत्येकालाच आपल्या घरात सगळ्या सुखसोयी अशाव्यात असे वाटत असते आणि ते योग्यच आहे परंतू आर्थिक ओढाताण करून सगळ्या गोष्टी विकत घेणे कितपत योग्य आहे? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि आवड आहे. काहींना कर्ज काढून वस्तू विकत घेतल्या की काहीतरी विशेष केल्यासारखे वाटते आणि पैश्याची बचत केल्याचा आनंद होतो. असो. एका बाबांची कैफियत मांडण्याचा छोटासा प्रयत्न !
[…]

1 17 18 19 20 21 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..