नवीन लेखन...

अशीही बनवाबनवी

ठाणे शहराचे महापालिका आयुक्त आर ए राजीव यांनी ठाणे खाडी किनाऱ्याच्या पूर्वेला १०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नवीन शहर बसवण्याचा निर्णय नुकताच जाहिर केला. या निर्णयाबाबत ज्येष्ठ पत्रकार श्री संदीप प्रधान यांनी आयुक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी  बातमी लिहिली. ही बातमी सोशल नेटवर्कींगच्या आणि इ-मेल्सच्या माध्यमातून शेकडो वाचकांपर्यंत पोहोचली. मराठीसृष्टीच्या वाचकांनाही ही माहिती विनासायास मिळावी या एकाच हेतूने ही बातमी येथे पुनर्प्रकाशित करत आहोत.
[…]

नाच रे मोरा…….. ग.दि.माडगूळकर

“नाच रे मोरा” ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात ‘चंदाराणी’,’शेपटीवाल्या प्राण्यांची’,’एक कोल्हा बहु भुकेला’,’चांदोबा चांदोबा भागलास का?’ यांसारखी बालगीते किंवा ‘जिंकू किंवा मरू’,’वंद्य वंदे मातरम्‌’ सारखी स्फूर्तीगीते, तसेच ‘नीज माझ्या पाडसा’ ‘बाळा जो जो रे’ यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.
[…]

दारा सिंग

दारा सिंग यांची माहिती नेटवर चाळत होतो. त्या भरात सगळे बालपण उगाळून घेतले. आमच्या बालमनातला अनेक आख्यायिकांचा नायक, अजिंक्यवीर, जगज्जेता पहिलवान दारा सिंग… त्याला मनःपूर्वक श्रद्धांजली.
[…]

म्हैस – पुलंची नि मोहनकाकांची

इ. स. २००९ साली निवडणुकांचे निकाल लागले नि मोहनकाकांची बस विकासाच्या वाटेवर टायमात सुटली. म्हणजे मंत्र्यांचा शपथविधी वेळेवर झाला. बसमध्ये केरळचा शशी मलुष्टे, लखनऊचा मुलायमशेठ, मायाताई, संगामामा, दिग्विनाना, एक साह्येब, (होम्योपथीचे नाही – पण अर्थशास्त्राचे) दोन डॉक्टर, दिल्लीचा युवराज, अशी तालेवार मंडळी होती.
[…]

पाऊस – कवीच्या मनात दडलेला

कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे…मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.
[…]

जिवनकलेची साधना – खरा देव

हा लेख परमपूज्य सदगुरू श्री समर्थ हंबीर बाबा यांच्या जीवन कलेची साधना या ग्रंथातून घेतलेले आहे. ख -या देवाची प्राप्ती करण्यासाठी किंवा होण्यासाठी केवळ मूर्तीपूजा किंवा व्यक्ती पूजा श्रेष्ठ नसून तो केवळ एक न संपणारा मार्ग आहे. ध्येय धरून निराकाराला किंवा निर्गुणाला आकारात किंवा सगुणात कसे आणता येईल ? एक निराकार त्या निराकाराला जणू शकतो. त्यासाठी स्वतः ला जो पर्यंत निराकारा ची आत्मा नु भूती येत नाही तो पर्यंत ह्या मार्गाचे अनुकरण म्हणजे दिशाहीन होय.
[…]

माती परिक्षणाची फिरती प्रयोगशाळा…

शेतकऱ्यांना जिल्हा पातळीवर येऊन माती परिक्षण करुन घेणे शक्य होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार मातीमधील नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शीयम, मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म लक्षात येत नाहीत व त्यासाठी काय करावे हे ही समजत नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने फिरती माती परिक्षण प्रयोगशाळा तयार केली आहे. […]

संगमेश्वरी नौका

सागरी सुरक्षेचे महत्व लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. याच आरमाराची शान असलेली ‘संगमेश्वरी’ नौका रत्नागिरी जिल्ह्याच्या निढळेवाडी येथील सुतारांनी तयार केल्याचे सांगितले जाते. सुतारकलेची ही परंपरा जोपासत आजही या गावात नौका तयार करण्याचा व्यवसाय करण्यात येतो.
[…]

1 149 150 151 152 153 236
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..