नवीन लेखन...

अस्तित्व

खरं तर प्रत्येकाच एक
विशिष्ठ अस्तित्व असतं
आत्मसन्मान जपताना
जीवनच पणाला लागतं

जगतानाही खरं तर
कुणीच कुणाचच नसतं
सारी नाती व्यवहारिक
हे सर्वत्र जाणवतं असतं

सोबती सुखाचे असतात
दुःखात तसं कुणी नसतं
प्रत्येकाचे संचित वेगळे
प्रारब्ध भोगायच असतं

मन संवेदना सारख्याच
सारं काही सोसणं असतं
काही किती जरी लपवलं
सत्य ! समोर येतच असतं
********

— वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908) 

रचना क्र. २९८

१९/११/२०२२

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..