नवीन लेखन...

अमृतानुभव

चैतन्य तुझ्या हृदयीचे सदैव असेच राहू दे
खोडकरपणा तव मनीचा सदैव असाच राहू दे ।
वार्धक्याची जाणीव नच व्हावी तुजला कधीही
मजवरचा प्रेमवर्षाव सखे सदैव असाच राहू दे ।
आता भांडण नच कोणाशी ना वैर आहे आपुले
एकमेकावरील प्रेमाची साथ सदैव टिकून राहू दे ।
तुजवरील प्रेमाने मी रचिल्यात कैक कविता जरी
त्या कवितेतील रचनांचा कैफ असाच राहू दे ।
मधूर तव कंठामधून ऐकल्यात मी माझ्या गझल
त्या मधूर तव कंठातील नशा अशीच धुंद राहू दे ।
एकेक शब्द तुझ्या मुखीचा अमृताचा प्याला जणू
अमृतानुभव तो मजला सदैव मिळत राहू दे ।

— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
दि. १६ सप्टेंबर २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..