नवीन लेखन...

अभिनेता भारत भूषण

भारत भूषण यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायची आवड होती. त्यांचा जन्म १४ जुन १९२० रोजी उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात झाला.पण त्यांच्या वडिलांना ते पसंत नव्हते म्हणून मग त्यांना घर सोडावे लागले. चित्रपटांमध्ये काम करायच्या उद्देशाने भारत भूषण कलकत्याला निघून गेले. त्यावेळेला तेथे मोठमोठे चित्रपट बनत होते. तेथे त्यांना संघर्ष करावा लागला. एक दिवस त्यांच्या कष्टाचं चीज झाले व त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळायला लागले. भारत भूषण चित्रलेखा या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून पडद्यावर आले. त्यांना सर्वात मोठा ब्रेक दिला तो म्हणजे केदारनाथ शर्मा यांनी सुहाग रात या चित्रपटामध्ये. या चित्रपटात भारत भूषण यांनी गीताबाली यांच्याबरोबर काम केले. हा चित्रपट हिट झाला. त्यांनतर १९५२ साली आलेला बैजूबावरा या चित्रपटाने त्यांना स्टार बनवलं. हा तो काळ होता जेव्हा भारत भूषण हे सगळ्या मोठ्या अभिनेत्री सोबत काम करत होते जसे मीनाकुमारी, वैजंतीमाला, गीताबाली सारख्यांबरोबर काम करत होते. आता ते चित्रपटांमध्ये अभिनयासोबत निर्माता म्हणूनही काम करू लागले.

भारत भूषण यांचे मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांमध्येही अनेक बंगले होते. महागड्या आणि परदेशी गाड्या पण होत्या. ते निर्मिती क्षेत्रात उतरले परंतु त्यांना यश आले नाही. काही चुकीच्या निर्णयांमुळे भारत भूषण राजा पासून भिकारी बनत गेले. गाडी बंगला सगळं काही विकायची वेळ आली. भारत भूषण यांना खूप आर्थिक संकटांना सामोरे जावं लागलं. एक वेळ अशी पण आली कि त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं. काही लोक म्हणत असत की हे सर्व त्यांच्या आणि मीनाकुमारीच्या प्रेमप्रकरणाचा परिणाम मानत होते. चित्रपटात मुख्य कलाकाराची भूमिका तर लांबच राहिली त्यांना छोटे मोठे रोल सुद्धा मिळेनासे झाले होते. त्यांची रोजची खायची सोया मोठ्या मुश्किलीने होत होती. असं म्हणतात कि ज्या स्टुडिओमध्ये गेल्यावर लोक न चुकता सलाम करायचे त्या स्टुडिओमध्ये भारत भूषण यांनी चौकीदाराची नोकरी देखील केली. याच गरिबीच्या परिस्थितीत भारत भूषण यांचे निधन २७ जानेवारी १९९२ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

भारत भूषण यांचे चित्रपट. भक्त कबीर (1942), भाईचारा (1943), सुहागरात (1948), उधार (1949), रंगीला राजस्थान (1949), एक थी लड़की (1949), राम दर्शन (1950), किसी की याद (1950), भाई-बहन (1950), आंखें (1950), सागर (1951), हमारी शान (1951), आनंदमठ और मां (1952) श्री चैतन्य महाप्रभु (1954), मिर्जा गालिब (1954), रानी रूपमती (1957), सोहनी महीवाल (1958), सम्राट्चंद्रगुप्त (1958), कवि कालिदास (1959), संगीत सम्राट तानसेन (1962), नवाब सिराजुद्दौला (1967)

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..