नवीन लेखन...

आ ई

सायंकाळची वेळ होती .

आई रोजच्यासारखी घरातील कामं करीत होती .

रविवार असल्यानं बाबा बाहेरगावी काही कामानिमित्त गेले होते .

दिवसभर निवांतपणे ती तिची कामे करत होती .

मुलांना आज खेळायला मुभा होती .पण झोपण्यापूर्वी दोन तास तरी अभ्यास करून घ्यावा असा आईचा नेहमीची शिस्त होती .

परीक्षाही जवळ आlल्या होत्या .

तिने मुलांना हाक मारली .

” मधू, रवी चला आता. खूप झालं खेळणं. हातपाय धुऊन या जेवायला.”

मधू असेल सहा सात वर्षाचा तर रवी त्यापेक्षा मोठा दहा वर्षाचा . दोघेही मुलं फार चुणचुणीत होती . आई बाबाचे सर्व ऐकणारी . शिवाय शेजाऱ्यापाजारऱ्याचं बारीकसारीक काम ऐकणारी .त्यामुळे सगळ्यांची लाडकी होती .वर्गातही पहिला -दुसरा नंबर नेहमीच आणणारी .

आईच्या हाके मधू आत आला .

” आई, आई”

मधु सांगू लागला, ” तुला माहिती नाही. रविदादा कधीचा अंगणात उभा आहे.दिवसभर काही खाल्लेल नाही.अन तू म्हणते पुरे झालं..खेळणं म्हणूंन ..”

आईच्या लक्षात आलं .हातातील कामं सोडून ती बाहेर आली .

मधुही पाठोपाठ आला .

” बापरे, देवा गा….” करीत आई रवीजवळ आली. बाहेर सर्वत्र अंधाराल होतं. रवी डगमगत उभा होता. तिने त्याला उचलू कडेवर घेतले.रडत रडत आई त्याचे मुके घेऊ लागली.

” वेडा कुठला ? असं कुणी करतं होय?” म्हणत घरात घेऊन आली.

रवीच्याही डोळ्यातून आसवं येऊ लागली .पण ती आनंदाची होती . आईनं आपल्याला माफ केलं .प्रेमाने जवळ घेतलं ..याचंच त्याला फार आनंद झालं होता ..रवीला.

दोघंही रडत होती .

आई मधूला व रवीला पोटाशी धरून स्वयंपाक घरात बसली .

” माझी गुणांची पोरं, शहाणी बाळं” असे म्हणत दोघांनाही कुरवाळू लागली.

मधू सांगू लागला , ” आई सांगू का ? दुपारपासून रविदादा अंगणात उभा आहे. मी त्याला सावलीत यायला सांगितलं . तरीही तो आला नाही . तुझं लक्ष नसताना मी त्याला खाऊ नेऊन दिला तर तोही दादाने खाल्ला नाहीच .

उलट आई रागावेल म्हणून घरात परत ठेवायला सांगितलं . काही बोलतही नव्हता . नुसता रडत होता .तू त्याला घराबाहेर काढलं आन विसरलीही . दादा नुसता एका जागेवर उभा होता . उन्हामुळं जागा किती गरम होती ..तरी एक पाय भाजला की दुसऱ्या पायावर उभा राहायचा .

मी त्याला सॅंडल नेऊन दिलि तरी नाहीच घातली त्यांन. मी येथे दरवाज्यात बसून त्याला गोष्टी सांगत होतो ..पण हसत नव्हता . तू मात्र खुशाल दुपारी झोपली ..विसरली दादाला शिक्षा दिल्याचं …दुष्ट कुठली ?”

मधुच्या दुष्ट कुठली या शब्दानं तिला जोराचा हुंदका आला .

रवीला अधिकच जवळ घेत ती रडू लागली . आसवं रवीच्या गालावर पडल्यानं पडल्यानं वेळ अबोल असणारा रवी आईचे अश्रू पुसत म्हणाला ,” आई , तू दुष्ट नाहीच , त फार छान आहेस . दुष्ट आहे तो मी , मी तुझं ऐकलं नाही . प्लिज आई रडू नकोस गं .”

रवीच आईचेआसवं पुसत समजावत होता .

कुठल्याशा कारणानं चिडून आई रवीवर रागावली होती .” जा घराबाहेर..दिवसभर तुला जेवणचं बंद..अंगणातच उभं राहायचं…हीच तुला शिक्षा.”

रवी खरंच निमूटपणे अंगणात भर उन्हात उभा राहिला .. अनवाणी.उपाशी ..

छोटा मधू विनवणी करत होता तरी नाही ऐकलं त्याचं .आई स्वतःयेईल. मला बोलावेल.याची वाट बघत बसला.

इकडे आईला विसरून गेली होती शिक्षेचे .

मुलं असावीत खेळत ..असं समजून ….

तिला पश्चाताप झाल्यासारखे झाले . दोघांनाही आपल्या हाताने घास भरवू लागली .

मधू त्याला भरवता असलेला घास आईचा हात रवीच्या दिशेन नेत होता .

ज अभ्यास नको म्हणून आईने दोघांनाही झोपायला नेलं .

आई खूप वेळ जागीच होती .

रवीच्या पायाला तेल लावीत , मालिश करीत .

झोपेतही रवी मात्र हसल्या सारखा दिसत होता … त्याला आईने माफ केले ..जवळ घेतले म्हणून .

आई मात्र रात्रभर जागीच….

स्वतःला म्हणत ….

“मी खरंच दुष्ट आहे, दुष्टच आहे मी”

— श्रीकांत पेटकर

Avatar
About श्रीकांत पेटकर 43 Articles
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..