नवीन लेखन...

पानगळीचे दिवस (कथा – सांगोपांग : ४)

आजची कथा : पानगळीचे दिवस
पूर्व प्रसिद्धी : कालनिर्णय सांस्कृतिक
दिवाळी २००४

‘ झाडाखाली सावलीत बसणाऱ्यांना , झाडाच्या आयुष्याशी काही देणंघेणं नसतं. झाड कुणी लावलं , कुणी वाढवलं , कुठल्या परिस्थितीत ते जगलं , याबद्दल विचार करावा असं पांथस्थाला वाटतंच असं नाही. पांथस्थ फक्त सावली शोधतो. घनदाट सावली. थंडगार सावली. ती सावली मिळाली , तनमन सुखावलं की त्याला आयुष्यातील सुखं मिळाल्याचा भास होतो.

आणि पानगळीच्या दिवसातला तो निष्पर्ण झालेला वृक्ष , नकोसा झालेला असतो. कधीकधी तो तिरस्काराचा विषय झालेला असतो. तो पुन्हा पानाफुलांनी डवरणार आहे , सावली देणार आहे ,हे जणू विसरून जायला होतं .’

हे तत्वज्ञान वाट्याला येणाऱ्या तात्यांची ही कथा.

निष्पर्ण होण्याआधी आपण आपल्या पूर्वायुष्याबद्दल घरच्यांना कल्पना द्यायला हवी होती. काजळलेला , नकोसा झालेला भूतकाळ दडवून इतरांचे संसार सावरण्यासाठी आपण धडपडलो , पण त्यात गैरसमजच अधिक वाट्याला आले. आपल्या अनाथ असण्याची बोच आपल्या बायको मुलांना टोचू नये म्हणून त्याबद्दलचे जे मौन स्वीकारले , ते तसे करायला नको होते हे निष्पर्ण होण्याच्या काळात त्यांना जाणवू लागलं होतं. नात्यांचे अर्थ , नात्यांचा मेंटेनन्स , संवाद , त्याची आवश्यकता ,या आणि अशाच जगण्याच्या गोष्टी जगाला शिकवता शिकवता आपण घरापुरते या शब्दांचे अर्थ विसरून कधी गेलो हे तात्यांच्या लक्षातच आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा मुलं , बायको दुरावली होती.त्यांचं दुरावणं आणि नंतर एकत्र येणं यामधल्या काळातल्या मनोवस्था रेखाटणारी ही कथा.

प्रत्येकाचे मनोव्यापार वेगवेगळ्या पातळीवर नेहमी सुरू असतात. आपापल्या विश्वात प्रत्येकजण बरोबर असतो पण कुटुंब, समाज म्हणून एकत्र राहत असताना इतरांचा विचार हा करावाच लागतो. नात्यांची वीण उसवत बसण्यापेक्षा ती अधिक घट्ट करण्यासाठी काय करता येईल , त्याचा विचारसुद्धा प्राधान्याने करावा लागतो.

कुटुंबव्यवस्थेबद्दल मला काही सांगायचं होतं , ते या कथेच्या माध्यमातून मी मांडलं आहे.

तसं पाहायला गेलं तर ही कथा एका चौकोनी कुटुंबाची , उपनगरातील एखाद्या ब्लॉकमध्ये घडणारी आहे.
पण मांडणी करताना त्या फ्रेममध्ये दरवेळी बाह्य जगातील संदर्भ येत जातात आणि मग ती कथा एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता अनेकांची होऊन जाते. निष्पर्ण वृक्षाबद्दलचं प्रेम , आपुलकी मनात उगवत जाते आणि पानगळीचे दिवस सुसह्य होऊन जातात.

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६

आपला प्रतिसाद अपेक्षित आहे .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..