नवीन लेखन...

‘एबीपी माझा’ मराठी वृत्तवाहिनीची १४ वर्षे

महाराष्ट्राचं नंबर एक न्यूज चॅनल ही ओळख एबीपी माझानं गेली १४ वर्षे कायम ठेवली आहे.

स्टार ग्रुप आणि भारतीय आनंद बझार पत्रिका या दोन संस्थांनी ३१ मार्च २००३ मध्ये स्टार माझा या नावाने या वाहिनीची सुरुवात केली. ही वाहिनी मीडिया कन्टेन्ट ॲन्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) या कंपनीच्या अखत्यारीत चालते. एमसीसीएस एबीपी टीव्ही आणि स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लिमिटेड या दोन कंपन्याच्या ७४:२६ भागीदारीत चालते.

भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित वृ्त्तसमूहांमध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुपची गणना होते. पूर्व भारतामध्ये या समूहाची अनेक प्रकाशने आहेत, आनंद बझार पत्रिका हे बंगाली भाषेतील सर्वाधिक खपाचे दैनिक आणि द टेलिग्राफ हे पूर्व भारतात सर्वाधिक खपणारे इंग्रजी दैनिक याच समूहाच्या मालकीचे आहे. द स्टार ग्रुप हा अशियातील अग्रगण्य मीडिया ग्रुप आहे. अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्या असून ९ भाषांतून ५३ देशातील सुमारे ३० कोटी प्रेक्षकांपर्यंत पोचतात.
एबीपी माझा ही पश्चिम बंगालच्या आनंद बाझार पत्रिका (एबीपी)’ या वृत्तसमूहाची २४ तास मराठी बातम्या देणारी वृत्तवाहिनी आहे. या वृत्तवाहिनीची सुरुवात २२ जून २००७ रोजी झाली. या वृत्तवाहिनीचे सुरवातीचे नाव ‘स्टार माझा’ होते. १ जून २०१२ नंतर ही वृत्तवाहिनी ‘एबीपी माझा’ नावाने ओळखु लागली गेली.

एबीपी माझा संपादक राजीव खांडेकर व एबीपी माझाचे अँकर ज्ञानदा कदम, अश्विन बापट,भारती सहस्रबुद्धे, राहुल कुलकर्णी, प्रशांत बडे,वैभव परब,मनश्री पाठक,प्रशांत कदम,सौरभ कोरटक व इतर हे उत्तम रीतीने काम करत असून अचूक आणि जलद बातमी… प्रेक्षकांची विश्वासर्हता या त्रिसुत्रीची कास एबीपी माझानं कधी सोडली नाही.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..