नवीन लेखन...

ययाति/ययातिच्या मनातिल द्वंद्व

 


क्षमा, दया आणि सहिष्णुता आहेत मानवतेची भूषणंआहे त्यागसहित भोगचमानव जीवनाची सार्थकता हे जाण.इति ऋषि वचन.

पाहुनी चिरकुमारीअक्षय अखंडित वसुन्धरेलाविसरून गेला ययाति ऋषि वचनाला. म्हणाला, “क्षमा आणि दया आहे दुर्बलांचे वचन वसुंधरा आहे वीरभोग्या दुर्बलांना नाही इथे अधिकार जगण्याचा.”

पायदळी तुडवलं त्यानी शुद्रतम जीवनं

मोठी होती बनली तीही मृगया मनोरंजनाची साधनं.

राक्षसी अट्टाहास करीत विक्षिप्त बलात्कारी मनुष्य तुटुन पडला धरतीवरीटर्र फाडली की तो त्यानी वसुधेची वसने पूरी.

धरतीच्या कोमल ह्रुदयातही खोल रुतवले अपुले राक्षसी दात सर्वत्र पसरल्या घावांतूनविषाक्त वायु पसरु लागला प्राण त्यात ययातिचाही कासाविस मग झाला.

स्वर्गस्थ देव ओरडले “धरणीशी बांधली आहे तुझ्या जीवनाची गाठत्यागून भोगाचा वसा वाचव आपल्या धरणीला”.

बघुन धरतीची दशा करू लागला ययाति विचार की शोधली पाहिजे आताअंतरिक्षात दूसरी धरा कुठे तरी दूर.

किंवा आपल्या शक्तिने देवताना करेन च्युत मग भोगू शकेन स्वर्णिम स्वर्गातुन अप्सरांना नित-नवीन.

कदाचित!अक्षय अमृताचे पात्रच भागवू शकेल माझी तहान.

काळातच दडलेलं आहे भाग्य मनुष्य पुत्राचं त्यजुनी नीच भोग मार्ग धरेल का ययाति त्याग-तपस्येचा मार्ग?

की हरवून जाईल मनुष्य पुत्र अंतरिक्षाच्या असीम अंधारात?

सध्या तरी ययाति किं कर्तव्यमूढ़.विचारात.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..