नवीन लेखन...

मैत्रि



“मैत्रि” हा शब्दच नुसता उच्चारला तरी मनांत एक आनंदाची लहर आल्याखेरीज राहत नाही. ज्यांनी मैत्री कधी अनुभवलीच नाही त्यांच्यासाठी हा शब्द भलेही खुपच लहान असेल पण यांच छोट्याशा शब्दांत किती तीव्रता, भव्यता दडलेली आहे, याची प्रचिती खर्‍या मित्रांनाच येणार.

“मैत्रि” ही एक कधीही न शमणारी

तहान, एक तडप आपल्या सोबतीला मिळविण्याची. तो एक दृढ विश्वास आहे दोन जीवांमधला. जो सहजासहजी कोणि तोडू शकत नाही. दोन वेगवेगळ्या जीवांमधला वास्तव्य करणारा एकच आत्मा म्हणजे “मैत्रि” खरंतर, याची महती शब्दांत व्यक्त करणं तसं अवघडचं, शब्द सुद्धा अपुरे पडतात. खरेतर, आपल्यावर कोणीतरी प्रेम करतेय ही भावनांच कित्येक पटीने श्रीमंत करते माणसाला.

मैत्रीमध्ये सहवासाला नक्कीच महत्त्व आहे. जुन्या लोणच्यासारखी जुनी मैत्रि मुरत जाते. यांत एकमेकांचे स्वरुप बरेचसे कळालेले असते एकमेकांसमोर आपली विशिष्ठ प्रतिमा उभी करण्याची गरजच भासत नाही. आपण जसे आहोत तसे निखळ व निर्भयपणे एकमेकांसमोर उभे असतो याच स्वाभाविक संबंधातून एक स्थैर्य, आत्मिक समाधान लाभते. भोवतालच्या फसव्या, अस्थिर जगांत मैत्रि सारखा स्थिर आधार नाही.

मैत्रिमध्ये पायांखालची जमिन ही जमिनच असते. मयसभेप्रमाणे जमिन समजून पाय ठेवावा तर पाण्यात पडतो व पाणी समजून सांभाळावे तर जमिन लागावी असे मुळीच होत नाही. जिथे फसवेपणाला थाराच नाही म्हणूनच खर्‍या मैत्रिचे एखादे ठिकाण तरी प्रत्येक माणसाला हवेच. जिथे मनुष्य पूर्णपणे मोकळा श्वास घेवू शकतो. व त्यामुळे सर्व जगांकडे प्रेमाने पहाण्याची एक दिव्यदृष्टी त्याला प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.

— सुषमा एडवण्णावर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..