नवीन लेखन...

मी….

मी – मी करुन कोणी मोठा होत नसतो म्हणून वावरतांना, मी पणा टाकायचा असतो आपल्यापुरते पाहणार्‍यांपासून आपलेच दूर जातात कारण काळीज असणार्‍यांनाच फक्त वेदना होतात. होत नसतं माझं – माझं म्हणण्यानं, काही घर माझं होत नसतंआणि दुसर्‍याला निंदल्यानं आपल्याला कुणी वंदत नसतं आपण घरांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचायचा नसतो. कारण

तो ऐकण्यासाठी जवळ कोणी उभा नसतो. करुन-सवरुन सर्व काही विसरायचं असतं नाहीतर जीवनाच्या बेरजेचं गणितच चुकलं असतं.

घरात दुसर्‍यांच्या सुखात सुख पहायचं असतं, आणि दुसर्‍यांच्या दु:खात, आपलं दु:ख विसरायचं असतं. सुरांमध्ये सुर मिसळून कोरसमध्ये गायचं असतं, आणि आपला तो वेगळा सुर काढून बेसुर गायचं नसतंआपल्या भावना जोपासताना दुसर्‍याच्या भावनेची कदर करायची असते. तेच आपलं कर्तव्य असून, जीवनाचे ध्येय तेथेच घुटमळत असते.

म्हणून माझं माझं म्हणाल्यानं काही माझं होत नसतं, तुझं-तुझं म्हणाल्यानं काही दुसर्‍यांचे होत नसतं.

कोणाला कधी हे समजले तर………………..

— सुषमा एडवण्णावर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..