नवीन लेखन...

मनाचे श्लोक – १९१ ते २०५

देहेबुेिचा निश्र्चयो ज्या टळेना | तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना |
पर ब्रध् ते मीपणे आकळेना | मनी शून्य अज्ञान हे मावळेना ||191||

मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे | दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे |
तया खूण ते हीन दृष्टांत पाहे | तेथे संग निसंग दोनी न साहे ||192||

नव्हे जाणता नेणता देवराणा | न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा |
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा | श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ||193||

वसे थ्दयी देव तो कोण कैसा | पुसे आदरे साधकूः प्रश्र्न ऐसा |
देहे टाकिता देव कोठे रहातो | परी मागुता ठाव कोठे पहातो ||194||

वसे थ्दयी देव तो जाण ऐसा | नभाचेपरी व्यापकू जाण तैसा |
सदा संचला येत ना जात कांही | तयावीण कोठे रिता ठाव नाही ||195||

नभी वावरे जो अणूरेणू कांही | रिता ठाव या राघवेवीण नाही |
तया पाहता पाहता तेचि जाले | तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले ||196||

नभासारिखे रूप या राघवाचे | मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे |
तया पाहता देहबुेाऩ उरेना | सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ||197||

नभे व्यापिले सर्व सृष्टी आहे | रघूनायका ऊपमा ते न साहे |
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे | तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ||198||

अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे | तेथे तर्कसंपर्क तोही न साहे |
अती गूढ ते दृढ तत्काळ सोपे | दुजेवीण जें खूण स्वामीप्रतापे ||199||

कळे आकळे रूप ते ज्ञान होता | तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था |
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे | तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे ||200||

कदा ओळखीमाजि दूजे दिसेना | मनी मानसी द्वैत कांही वसेना |
बहुता दिसा आपुली भेटि झाली | विदेहीपणे सर्व काया निवाला ||201||

मना गूज रे तूज हे प्राफ्त जाला | परी अंतरी पाहिजे यत्न केले |
सदा श्रवणे पाविजे निश्र्चयासी | धरी सज्जन संगती धन्य होसी ||202||

मना सर्वही संग सोडून द्यावा | अती आदरे सज्जनाचा धरावा |
जयाचेनि संगे महादुःख भंगे | जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ||203||

मना संग हा सर्व संगास तोडी | मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी |
मना संग हा साधका शीघ्र सोडी | मना संग हा ेमत निशेष मोडी ||204||

मनाची शते एकता दोष जाती | मतीमंद ते साधना योग्य होती |
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी | म्हणे दास विश्र्वासता मुक्ति भोगी ||205||

– श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..