नवीन लेखन...

प्रेम म्हणजे काय?

खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.

लैला मजनूच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणार्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने अलग-अलग असले तरी त्यांचे ह्रदय एक होते. लैला मजनूच प्रेम हे खरं प्रेम होत. आजच्या तरुण पीढ़ीच्या प्रेमाच्या कल्पना काय?

तो स्मार्ट – ती सुन्दर, त्याला ती आवडली आणि तिलाही तो आवडला. त्यानी एकत्र सिनेमा पाहिला, एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरले आणि बहरलेल्या यौवनाचा आनंद घेतला. त्याना वाटले ते प्रेमात पडले. त्यानी प्रेम विवाह केला. एकत्र एकाच घरात राहण सुरु झाल. एकमेकांच्या आवडी-निवडी वादाचे विषय होऊ लागले. शुल्लक गोष्टींवरून भांडणे सुरु झाले. दोघांचाही अहंकार मोठा होता. परिणाम –

“देहाचा आकर्षणाने दोघ जवळ आले
प्रेमा अभावी ते शीघ्र डायवोर्सि झाले”

‘ती’ – मी प्रेमात आंधळी झाली होती, ‘तो’ -मी मूर्ख होतो म्हणून हिच्या प्रेमात पडलो. पडनारच! कारण याना प्रेमाचा अर्थ कळलेला नव्हता.

काहींची प्रेमाची गाड़ी विवाहा पर्यंत ही पोहचत नाही. कारण देहाचे आकर्षण क्षणभंगुर असते व ते संपल्यावर प्रेम ही संपते. तो किंवा ती कोणी तरी एक प्रेमभंगाला कारणीभूत ठरतो. आपण वर्तमानपत्रांत रोज वाचतो प्रेमभंग झाल्याने कोणी आत्महत्या करतो तर कोणी खून सुद्धा. कारण यानाही प्रेमाचा अर्थ कळलेला नसतो.

काही आपापला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी प्रेमाचा देखावा करतात. मी ही डॉक्टर -ती ही डॉक्टर, आपण एकत्र आलो तर चैनित आयुष्य जाईल. किंवा दोघही नौकरी करणारे – स्वार्थ मनात ठेउन प्रेम करतात. याला काय म्हणायच –

प्रेमाचा देखावा आज फायद्याचा सौदा आहे,
विवाह सुध्दा आज देह भोगण्याचा करार आहे.

स्वार्थापोटी केलेल प्रेम भंग पावणारच. मग घटस्फोट हा होणारच यात आश्चर्य नाही. कारण यानाही प्रेमाचा अर्थ कळलेला नाही.

मग प्रेम म्हणजे काय?

आपल्या सोंदार्याचा अभिमान बाळगून पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती कामदेवाच्या मदतीने शंकराचे प्रेम जिंकायला निघाली. परिणाम काय झाला – शंकराने आपले तीसरे नेत्र उघडले व कामदेव भस्म झाला. पार्वतीला आपली चूक कळली. तिने तपस्येचा मार्ग धरला. आपला अहंकार, अभिमान इत्यादि तपस्येच्या अग्नित भस्म केले. अखेर शंकर प्रसन्न झाले. पार्वतीलाही प्रेमाचा अर्थ कळला. आपण पहातोच, वसंतात बहरलेल्या कच्च्या कैरीला ही ग्रीष्माच्या उन्हात तपावे लागते, मगच रसाळ-मधुर असा आम्बा आपल्याला खायला मिळतो. आपल्या मनातिल विकाराना अग्नित भस्म केल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळणे अशक्य म्हणूनच एका उर्दू शायरने प्रेमाबद्धल म्हंटले आहे “इक आग का दरिया है तैर के जाना है” आणि आगीचा दरिया पार करण्यासाठी डोळे उघडे असायला पाहिजे. आंधळ्या माणसाचे हे काम नव्हे.

एकदा शेजारच्या एका आजीला विचारले -तुम्ही कधी प्रेम केले आहे का? प्रेमाचा अर्थ काय? आजी म्हणाली प्रेमाच तर सोडा त्या काळी लग्नाआधी मुलाला मुलगी दाखविण्याची पद्धत ही नव्हती. बायको म्हणजे – आईच्या मदतीला घरकामासाठी आणलेली हक्काची बाई. ती आपल्याला देह सुख ही देते व घराला वारस ही. त्या काळी बायकाना कष्ट हे करावे लगायचेच. कधी -कधी मार ही खायला मिळायचा. आपले माहेरचे अस्तित्व विसरून नवर्या साठीच आपल आयुष्य आहे हे मनात ठरवून सासरी संसार सुरु केला. काही वर्षात चित्र बदलले. एका दुसर्याची सवय लागली. त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. माझ्यासाठी त्यानी आपला स्वभाव ही बदलला. माझ्या आवडी -निवडीकड़े ते जातीने लक्ष देऊ लागले. मला काय हवे त्याना न सांगताच समजू लागले होते. आज एका दुसर्याच्या मनात काय आहे हे न बोलताच आम्ही समजू शकतो. आता ही त्यांच्या मनात काय विचार चालला आहे, हे मी सांगू शकते. त्यागाशिवाय प्रेम सम्पादित करता येत नाही हेच खरं. संसाराचे चटके बसल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळने अशक्यच. आजीचे बोलणे मला पटले. आजीने खरोखरच तपस्या केली होती म्हणून तिला प्रेमाचा अर्थ कळला होता. असे प्रेम पाहूनच अमीर खुसरो ने म्हंटले आहे-

खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.

शरीराने अलग-अलग असले तरी प्रेम रंगात भिजुन दोघांचे ह्रदय एक झाले होते. कारण प्रेमात द्वैत नाही. सूफी संतांच्या मते लौकिक प्रेम ही अलौकिक प्रेमाची पायरी आहे. कारण ज्याच्या हृदयात प्रेम आहे तोच ईश्वराला प्राप्त करू शकतो.

याचा अर्थ लग्ना आधी प्रेम नाही केले पाहिजे असा नाही. प्रेम अवश्य करा, पण आपण प्रेमात पड़त आहो असे वाटत असेल तर आपले डोळे उघडा – स्वत:लाच प्रश्न विचारा- हे देहाचे आकर्षण तर नाही ना? यात आपला स्वार्थ तर नाही ना? कुठल्याही परिस्थितीत आपण त्याचा/ तिचा साथ देऊ शकतो का? त्याच्या/ तिच्या साठी आपण आपल्या सर्वस्वाचा अर्थात आपला अहंकार, अभिमान इत्यादींचा त्याग करू शकतो का? याचे उत्तर होय असेल तरच पुढे पाऊल उचला. अन्यथा प्रेमात पड़नारच. खर्या प्रेमाच्या प्राप्ति साठी तपस्या ही करावीच लागते. दोघाना शरीराने आणि मनानी एक व्हावे लागते. तेंव्हाच प्रेमाची प्राप्ति होते, म्हणूनच कवीरदासानी म्हंटले आहे –

जब मै था तब हरि नाही, जब हरि है मैं नाही,
प्रेम गली अति सांकरी, ज्यामे दो न समाई.

*******

(प्रेम करण्या पूर्वी किंवा प्रेमात पडलेल्यानी, हा लेख अवश्य वाचावा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा).

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..