नवीन लेखन...

गारपीट ग्रस्त

निसर्गाच्या लहरीपणाचा मला आता

खरोखरच खुप राग आलाय

त्याला जर गारपीटांचा मारा करायचाच होता

तर तो निदान श्रीमंतांच्या मुंबईत तरी करायचा

म्हणजे गरीब शेतकर्यांच्या आत्महत्या तरी टळ्ल्या असत्या…

मुंबईकरांना काश्मिरात जाऊन आल्याचा आनंद

घरबसल्याच मिळाला असता

कोणालाच कोणाकडे मदतीसाठी मदतीचा

हात मागावाच लागला नसता…

ऐन निवडणूकीत राजकारण्यांच्या

डोक्याला ताप झालाच नसता

खोट्या आसवांचा आणि आश्वासनांचा

बाजार मांडला गेलाच नसता…

प्रसारमाध्यमांनी विनाकारण तिच ती दृष्ये

पुन्हा-पुन्हा दाखविण्याचा उद्योग केलाच नसता

गारपीटांखाली चिरडलेली शेतकर्यांची स्वप्ने

शोधण्यापेक्षा गारपीटात दडलेला गारवा

शोधण्यात त्यांना अधिक उत्साह वाटला असता.

म्ह्णूनच कदाचित मुंबईकर निसर्गाच्या

या लहरीपणावर रूसला असावा

आणि त्याला गारपीट्ग्रस्त शेतकर्याच्या

हृद्यात बोचलेला काटा तितकासा दिसला नसावा.

कवी- निलेश बामणे.

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..