नवीन लेखन...

खाद्य-यात्रा

अख्ख्या मसुराची उसळ

साहित्य : उसळीसाठी दोन वाट्या अख्खे मोड आलेले मसूर (दोन दिवस आगोदर भिजत घालून मोड आणून घ्या म्हणजे उसळ जास्त पौष्टिक होईल) ,दोन मध्यम आकाराचे कांदे , दोन मध्यम आकाराचे टोमॅटो , सुके किसलेले गोटाखोबरे भाजून घेऊन,जिरे भाजून घेऊन, १० / १२ लसुण पाकळ्या , एक टेबलस्पुन

गरम मसाला , चवीनुसार लाल तिखट , अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट (जास्त झाले तरी चवीत फारसा फरक पडत नाही कारण हे फार तिखट नसतेच) , चवीप्रमाणे मीठ व साखर किंवा गूळ,चिंच किंवा आमसुल ,फोडणीसाठी जीरे – फोडणीसाठी तेल,बारीक चिरलेली
कोथींबीर

कृती : उसळ करण्यापूर्वी मोड आलेले अख्खे मसुर ३ ते ४ तास साधारण कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. (यामुळे शिजण्याचा वेळ वाचतो),मग कांदा, टोमॅटो, बारीक चिरुन घ्या,लाकडी पोळपाटावर लसुण ठेचुन घ्या,गॅसवर एका
कढईत तेल तापवुन त्यात जीरे, लसुण आणि कांदा घालाघालून कांदा शिजेपर्यंत मध्यम आचेवर परतुन घ्या.
मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला,टोमॅटो शिजत आला की मसुर घाला व नीट परतुन घ्या,नंतर लाल तिखट, कश्मिरी तिखट, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथींबीर घाला,मसुरच्या दुप्पट पाणी घालुन मसुर शिजायला ठेवुन द्या,उसळ चांगली शिजल्यावर एका बाउलमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली कोथींबीर घालून झाकून ठेवा.

— श्री.प्रमोद लक्ष्मण तांबे उर्फ पामयाा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..