नवीन लेखन...

किचन क्लिनीक – फलवर्ग

आता आपण कंदमुळ हा वर्गपुर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळूया तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट तो म्हणजे फळांचा.फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे.आपण सर्वच जण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो.उस वक्त हम आव देखते हैं न ताव.

हो खरेच फळे पौष्टिक,रूचकर असतात हे खरे तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिज् देखील असतात.पण हिच फळे खाताना जर आपण काही नियम पाळले तर मला वाटते आपण सेवन करत असलेल्या फळांचा आपल्या शरीराला अपाय न होता फायदाच होईल.

फळं खात असताना आपण हि खुण गाठ मनाशी घट्ट बांधावी कि ती कायम पोट रिकामी असताना एक आहाराचा भाग म्हणून खावी.कारण बरीच मंडळी भरपेट जेवण झाल्यावर फळे कापून खातात,हे असे करणे म्हणजे रोगाना आयते आमंत्रण होय.कारण जेवल्यावर फळे खाण्याने त्याचा विपरीत परिणाम खाल्लेल्या अन्नाच्या पचनावर होऊन रक्तातील ट्रायग्लिसराईड्स देखील वाढतात हे माझ्या वाचनात आले होते जे मला पटले.त्याचा विस्तार येथे करणे अयोग्य होईल.

दुसरा प्रकार म्हणजे हिच फळे दुध,दही,पनीर,चक्का,आयस्क्रीम ह्या सोबत खाणे जसे फ्रूट सलाड विथ कस्टर्ड,शेक्स इ वारंवार खाणे म्हणजे त्वचा रोग,सर्दी,दमा,खोकला,सायनस ह्याला आयतेच निमंत्रण होय.

तसेच काही मंडळींना फळांचा रस पिण्यात भारी रस असतो.पण गरज नसताना असे करणे म्हणजे आपल्या पचन शक्तीवर अतिरिक्त ताण देणे होय.कारण जेव्हा आपण सबंध फळ खातो तेव्हा आपल्या पोटात त्याचा चोथा ज्यास फायबर म्हणतात ते जाते,पण रस काढायला व त्यातून पोट भरायला भरपूर फळे वापरावी लागतात.त्यामुळे सहाजीकच जास्त साखर व पर्यायाने उष्मांक शरीरात गेले कि नाही.त्यामुळे मी तर कायम फ्रूट ज्युसच पिते पण वजन मात्र कमी होत नाही अशी तक्रार करणार्याॅनी हे लक्षात घ्यावे.

तसेच सकाळी नाश्त्याला इतर पदार्थ खाऊन असे पाश्चात्यांन प्रमाणे ज्युस पिणे म्हणजे पोटाचे विकार,अपचन,व वजन वाढीला आयतेच आमंत्रण आहे हे लक्षात असु द्यावे.

म्हणूनच फळे खा पण ते खायचे नियम पाळून बरे का!
ह्या विभागाची माहिती देण्यापुर्वी मला आपणांस हे सांगणे आवश्यक वाटले कारण आपल्या पैकी बरेच जण ह्या अशा चुका फळे खाताना हमखास करत असतात.

वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..