नवीन लेखन...

वेश्या व राजकारणी

दिवसेंदिवस घसरत चाललेली राजकारणाची पातळी मला मुंबईच्या कामाठीपूरा, फोरास रोड, पिला हाऊस या परिसरातील ‘वेश्या’ बाजाराची याद दिलवते..फरक एकच, या परिसरात बसलेल्या वेश्या बऱ्याचश्या बळजबरीने व काही पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या व्यवसासात आलेल्या असतात.

खरं तर वेश्या आणि राजकारणी यांची तुलना करून मी वेश्यांचा अपमान करतोय याची मला जाणीव आहे. वेश्या -बळजबरीने वा नाईलाजाने- एकदा का या ‘धंद्या’त आल्या, की त्या आयुष्यभर या ‘व्यवसाया’शी प्रामाणिक राहातात..करत असलेल्या ‘धंद्या’शी प्रामाणिक राहातात व राजकारणी मात्र लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण या ‘व्यवसाया’त येतात आणि प्रत्यक्षात मात्र लोकांवर बलात्कार करण्याचा ‘धंदा’ करतात..

सर्व प्रकारचे व्यवसाय-धंदे करणारे लोक त्या त्या व्यवसायात आवश्यक असणारी एक किमान नैतिकता पाळतात. परंतू राजकारण हा एकच व्यवसाय असा आहे की इथे कुणी नैतिकता पाळली, की ती व्यक्ती या ववसायातून बाहेर गेलोच म्हणून समजा..नैतिकता नसणे ही एकमेंव अट राजकारणासाठी लागते असा माझा समज गेल्या काही वर्षांत दृढ झाला आहे..आणि तो बरोबर आहे हे दिवसेंदिवस चाललेल्या तमाशावरून (तमाशाचा अपमान करायची इच्छा नाही, आता हा शब्द आठवला म्हणून उल्लेख केला एवढंच..! माफी असावी.) सिद्ध होत आहे.

— नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..