नवीन लेखन...

विसरायचं म्हणलं तरी

विसरायचं म्हणलं तरी
मन अधिक भरकटत
किती आवरा मनाला
नको तिथं गुंतून जातं…
ओल्या आठवणी साऱ्या
कातरवेळी मनात तरळतात
डोळ्यांतील अलगद थेंब मग
पापणी आड जमा होतात…
आठवणींचं गाठोडं कस
अलगद हलकं करायचं ?
रित्या मनाला खोलवर
कस सावरुन घ्यायचं…
नको होतात मग रात्री
तुझी आठवण ती येता
हळवे होते मन त्या वेळी
रात्र सुनी अबोल होते तेव्हा…
वळणावर चालतांना मग
मन नक्कीच गुंतून जातं
सोडायच्या वाटा वळणावरील
तो मार्ग सहज सोप्पा नसतो…
भिजलेले मन हलकेच तुझ्या
मिठीतल्या आठवणीत रमते
मन गुंतत जाते अधिक तेव्हा
मनाचे खेळ न कोणास कळते…
आठवणींच्या उंच झरोक्यात
कवडसा ही निःशब्द होतो
दिसत नाही जखमा काही
पण काटा नक्कीच बोचतो…
तुझ्या मिठीच्या चांदण्यात
अलवार मी मोहक गंधाळते
तुला न कळले चांदणे ते
रेशमी धाग्यात मी गुंतले..
काहूर मोहाचे अंतरी उठता
तू नक्कीच मनात असतो
भावनेत मी बंदिस्त होते
अलवार तू हृदय अंगणी मोहरतो…
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..